AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘एवढी मग्रुरी, एवढी मस्ती..’; दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा संताप, थेट सरकारला सवाल

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली, त्यानंतर आज आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी यावरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

'एवढी मग्रुरी, एवढी मस्ती..'; दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा संताप, थेट सरकारला सवाल
aaditya thackeray
| Updated on: Apr 05, 2025 | 5:15 PM
Share

पुण्यातील दीनानाथ रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला रुग्णालय प्रशासनानं दहा लाख रुपये जमा करण्यास सांगितले, तोपर्यंत तीला दाखल देखील करून घेतले नाही. उपचार न मिळाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर आता राज्यभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. तनिषा भीसे असं या मृत महिलेचं नाव आहे. तनिषा भीसे या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नी आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जरोदरा हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

एक महत्त्वाच्या विषयावर आज मी पत्रकार परिषद घेत आहे. खरं पाहिलं तर काही विषयांवर आम्ही राजकारण टाळत असतो. जनहिताची आंदोलन घेत असतो. आज पुण्यामध्ये भाजपच्या काही महिला कार्यकर्त्यांनी एका खासगी क्लिनकमध्ये जाऊन तोडफोड केली आहे. हे प्रकरण संबंधित आहे, ते म्हणजे अर्थातच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलशी . मी दोन दिवसांपासून या घटनेवर काहीच बोललो नाही, कारण या घटनेवर बोलणं मला योग्य वाटत नव्हतं, कारण बऱ्याचदा असं होतं की एखाद्या घटनेवर आपण बोलतो, तेव्हा त्या घटनेला राजकीय दृष्टीकोणातून पाहिलं जातं. मात्र काल आम्ही शिवसेना ठाकरे गटानं आंदोलन केलं, कारण यावर सरकार पूर्ण पणे गप्प असल्याचं आम्हाला दिसून आलं. आज  भाजपचेच कार्यकर्ते असुरक्षीत आहेत, त्यांनाच न्याय मिळत नाहीये, असा टोला यावेळी आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, हॉस्पिटल प्रशासनाला एवढी मग्रुरी आणि मस्ती कशाची आली आहे? ते देखील कळणं गरजेचं आहे. या रुग्णालयामध्ये जे काही दोष असतील ते दोष सुधारण्यासाठी सरकार पुढे येईल का? किंवा सरकार हे हॉस्पिटल स्वत:कडे चालवण्यासाठी घेणार का? हे पण कळालं पाहिजे, आणि जे हॉस्पिटल दहा लाख भरा नाहीतर आम्ही तुम्हाला अॅडमिट करणार नाही असं म्हणतं, अशा हॉस्पिटलचं काही देणं आहे का महापालिकेला, आयटीला, अजून कोणाला -कोणाला हे देखील समोर आलं पाहिजे, असं यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.