AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेक्षकांची पाठ, निर्माते ‘अग्निहोत्र 2’ गुंडाळणार

प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'अग्निहोत्र 2' ही मालिका (Aghanihotra 2 Tv serial) लवकरच गाशा गुंडाळणार आहे.

प्रेक्षकांची पाठ, निर्माते 'अग्निहोत्र 2' गुंडाळणार
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Feb 25, 2020 | 9:14 PM
Share

मुंबई : प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘अग्निहोत्र 2’ ही मालिका (Agnihotra 2 Tv serial) लवकरच गाशा गुंडाळणार आहे. दहा वर्षांपूर्वी या मालिकेच्या पहिल्या पर्वाला तुफान लोकप्रियता मिळाली होती.  त्याच पार्श्वभूमीवर नव्या कथेसह ‘अग्निहोत्र 2’ मालिका 2 डिसेंबर 2019 पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र, प्रेक्षकांचा या नव्या पर्वाला प्रतिसाद न मिळाल्याने टीआरपीमध्ये ही मालिका मागे पडली. त्यामुळे निर्मात्यांनी ही मालिका बंद करण्याचा नर्णय घेतला.

‘अग्निहोत्र 2’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या मालिकेच्या टीझरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसादही मिळाला. विशेष म्हणजे अभिनेते शरद पोंक्षे यांनी कर्करोगावर यशस्वीपणे मात करत या मालिकेमार्फत पुन्हा कलाविश्वात पुनरागमन केलं. त्यांनी अत्यंत चोखपणे आपली जबाबदारी पार पाडली. मात्र, तरीही अखेर निर्मात्यांवर ही मालिका (Agnihotra 2 Tv serial) बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे.

‘अग्निहोत्र 2’ मालिकेचा शेवटचा भाग येत्या 9 मार्चला प्रसारित होणार आहे. त्यानंतर ‘वैजू नंबर 1’ ही मालिका सुरु होणार आहे. मालिका सुरु झाल्यानंतर दोन महिन्यातच ही मालिका बंद होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे शरद पोक्षें, रश्मी अनपट, राजन भिसे यांसारख्या मातब्बर कलाकारांनी भूमिका साकारली. या कलाकारांनी मालिकेत अप्रितम कामही केलं. मात्र, तरीही प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ फिरवली.

दहा वर्षांपूर्वी ‘अग्निहोत्र’ मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होते. अग्निहोत्री कुटुंब, सात गणपतींचं रहस्य आणि त्यातील पात्र यांनी प्रेक्षकांना अक्षरश: भुरड घातली होती. त्यामुळे आजही ही मालिका अनेकांच्या स्मरणात आहे. ‘अग्निहोत्र’ मालिकेला मिळालेला प्रतिसाद पाहता निर्मात्यांनी ही मालिका नव्या कथेसह पुन्हा सुरु केली. दोन्ही पर्वाची कथा श्रीरंग गोडबोल यांनी लिहिली. तर पहिल्या पर्वाचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं तर दुसऱ्या पर्वाचं दिग्दर्शन भीमराव मुडे यांनी केलं. मात्र, प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद या मालिकेला मिळाला नाही.

Follow Us
पेपर लीक रोखण्यासाठी NTA चा भयानक ‘चक्रव्यूह’; परीक्षा होईपर्यंत सर्व
पेपर लीक रोखण्यासाठी NTA चा भयानक ‘चक्रव्यूह’; परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स गुप्त ठिकाणी अन् एकाच...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!
INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? राऊतांनी दिले मोठे संकेत
Sanjay Raut UNCUT | INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत
मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
Kolhapur | चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींची पसंती, तरीही हुकली संधी.....
Ashok Gehlot | काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींची पसंती, तरीही हुकली संधी; अशोक गेहलोत यांचा मोठा गौप्यस्फोट!
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम; नेमकी मागणी काय?
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!