AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिंधुदुर्ग ते मुंबई हवाई प्रवास महागला, तिकीट दराची ‘उड्डाणं’, महिन्याभरात दर चारपट वाढले!

सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ सुरु होऊन जेमतेम महिना उलटून गेलाय. अशात मुंबई ते सिंधुदुर्ग हवाई प्रवास  भलताच महाग झालाय. महिनाभरात तिकीटाचे दर तब्बल चारपट वाढले आहेत. महिनाभरापूर्वी मुंबईहून सिंधुदुर्गात जाण्यासाठी ज्या विमानाला 2500 रुपये द्यावे लागायचे त्याच विमानातून प्रवास करण्यासाठी आता तब्बल 12 हजार रुपये मोजावे लागतायत.

सिंधुदुर्ग ते मुंबई हवाई प्रवास महागला, तिकीट दराची 'उड्डाणं', महिन्याभरात दर चारपट वाढले!
फोटो : संग्रहित
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 10:47 AM
Share

सिंधुदुर्ग:  सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळ सुरु होऊन जेमतेम महिना उलटून गेलाय. अशात मुंबई ते सिंधुदुर्ग हवाई प्रवास  भलताच महाग झालाय. महिनाभरात तिकीटाचे दर तब्बल चारपट वाढले आहेत. महिनाभरापूर्वी मुंबईहून सिंधुदुर्गात जाण्यासाठी ज्या विमानाला 2500 रुपये द्यावे लागायचे त्याच विमानातून प्रवास करण्यासाठी आता तब्बल 12 हजार रुपये मोजावे लागतायत.

कोकणातील दोन-तीन पिढ्यांनी विमानतळाचं स्वप्न पाहिलं. 9 ऑक्टोबरला हे स्वप्न सत्यात उतरलं. केंद्रीय विमान वाहतूक उड्डानमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्य्या प्रमुख उपस्थितीत चिपी विमानतळाचं उद्घाटन मोठ्या धुमधडाक्यात पार पडलं. उद्घाटन सोहळ्याला जेमतेम महिना उलटून गेलेला असतानाच विमान तिकीटाचे दर तब्बल चार पट वाढले आहेत. त्यामुळे विमान प्रवास करण्याची इच्छा असणाऱ्या कोकणवासियाची मात्र घोर निराशा झाली आहे.

2500 हजारांचं तिकीट आता 12500 रुपयांना!

चिपी विमानतळ सुरू झाल्यामुळे कोकणात विमानाने जाण्याचं प्रत्येक कोकणवासियाचं स्वप्न होतं. अगदी अडीज तीन हजार खर्च करुन आपण गावी जाऊयात, असं चाकरमनी मोठ्या अभिमानाने सांगत होते. पण आता तीन हजारांचं तिकीट तब्बल 12 हजार रुपयांना घ्यावं लागणार आहे. चाकरमान्यांच्या वाढत्या मागणीमुळे तिकीट अडीच हजार रुपयांवरून 12 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.

चिपी विमानतळ उडान योजनेत असताना तिकीटाचे दर वाढले!

सिंधुदुर्गतील चिपी विमानतळ उडान योजनेत असताना तिकीटाचे दर वाढल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. तसंही सणासुदीत विमान तिकीटाचे दर वाढतात हे खरंय पण हे दर आणखीनच वाढण्याची शक्यता आता वर्तवली जातीय.

महिनाभरात विमानांची उड्डाणांवर उड्डाणं!

मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमानसेवा 9 ऑक्टोबरपासून सुरु झाली. म्हणजेच विमानसेवा सुरु होऊन जेमतेम महिना उलटलाय. पण गेल्या महिनाभरात या विमानसेवाला चाकरमन्यांना जोरदार प्रतिसाद दिला. गेल्या महिनाभरात विमानाचं तिकीट मिळणं मुश्किल होतं. त्यात दसरा दिवाळीमुळे तर तिकीटांचं बुकिंग अगोदरच झालं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर 2500 हजारांवरुन विमान तिकीट आता 12 हजारांवर जाऊन पोहोचलं आहे.

विमानतळ सिंधुदुर्गचं, नाव चिपी परुळे का?

तब्बल 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 9 ऑक्टोबरपासून सिंधुदुर्गातील नव्या ‘चिपी परुळे’ विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरु झाली आहे. सिंधुदुर्गवासीयांसाठी ही निश्चितच मोठी खुशखबर होती. किंबहुना जिल्ह्याच्या इतिहासात 9 तारखेचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला. हे विमानतळ सिंधुदुर्गाची शान ठरली आहे. याचवेळी विमानतळाच्या नावाची चर्चा तर होणारच ना! विमानतळ संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे, मग याला नाव ‘चिपी विमानतळ’ का असा प्रश्न सर्वांनाच पडला. मग यामागची पार्श्वभूमी काय आहे हे जाणून घेणे फार रंजक आहे.

आपल्याला माहीतच आहे, कुठलाही सार्वजनिक प्रकल्पाचे लोकार्पण करायचे असेल तर त्याचे आधी नामकरण केले जाते. अनेकदा मग याच नामकरणावरून वादाला तोंड फुटते. मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळा’च्या नावाबद्दलही राजकरण झाले, तर मग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विमानतळाबाबतही नावाबाबत प्रश्न पडणे साहजिकच आहे. या विमानतळाचा उल्लेख चिपी परुळे विमानतळ असा केला जाणार आहे. यामागचे कारण म्हणजे हे विमानतळ उभे राहिलेय ते परुळे गावातील ‘चिपी वाडी’मध्ये. चिपी म्हणजे परुळे गावचाच एक भाग. पूर्वी चिपी हे एक पठार होते. आता याच भागातून विमानाचे उड्डाण होताना दिसत आहे.

(Air travel from Sindhudurg to Mumbai is expensive Rates quadruple in a month)

हे ही वाचा :

चिपी विमानतळाच्या धावपट्टीवर कोल्हा, पायलटने पुन्हा विमान आकाशात उडवलं, 10 मिनिटं थरार!

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.