मुंबई: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईतही सकाळापासूनच पावसाने जोर धरल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहेत. मुंबईत अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसाने पाणी भरल्याने भाजप आमदार अमित साटम यांनी महापालिकेवर टीकास्त्र सोडलं आहे. पालिकेने गेल्या दहा वर्षात 964 कोटी रुपये खर्च केले आहेत. मग मुंबईत का पाणी भरत आहे, असा सवाल अमित साटम यांनी केला आहे. (amit satam slams shiv sena over nullah cleaning)