AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओबीसी आंदोलन स्थगित होताच पंकजा मुंडे यांची तात्काळ पत्रकार परिषद, पाहा काय म्हणाल्या…

राज्य सरकारकडून शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली होती. या बैठकीला ओबीसी नेते उपस्थित होते. त्यानंतर आज ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली.

ओबीसी आंदोलन स्थगित होताच पंकजा मुंडे यांची तात्काळ पत्रकार परिषद, पाहा काय म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी टोचले सरकारचे कान
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 22, 2024 | 4:28 PM
Share

ओबीस आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांची समजूत काढायला राज्य सरकारला यश आलं आहे. शुक्रवारी झालेल्या महाबैठकीनंतर आज छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हाके यांनी हे उपोषण त्यांनी तात्काळ स्थगित करत असल्याचं जाहीर केलं आहे. या उपोषणानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. पत्रकार परिषद पंकजा मुंडे काय म्हणाल्या जाणून घ्या.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

हाकेंच्या उपोषणाची दखल घेतली आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी उपोषण स्थगित केलं. सरकारकडून सकारात्मक उत्तर मिळावं म्हणून त्यांनी उपोषण मागे घेतलं असेल. पण त्यांना पुन्हा उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये. हाके आणि वाघमारे यांनी ज्या मागण्या दिल्या, त्यांनी मत आणि मागण्या सांगितल्या आहेत. चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र दिलं आहे, असं म्हटलंय. तर ते तपासलं पाहिजे. चुकीचं असेल तर रद्द केलं पाहिजे. नसेल तर तसं सांगितलं पाहिजे. त्यात कुणाला अडचण असण्याचं कारण नाही. हाके यांचं सालस उपोषण आहे. त्यांची भाषा नम्र आहे. त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून रिस्पेक्ट वाटतो. बाकी कोण काय म्हणतंय त्याकडे पाहण्याची गरज नसल्याचं पकंजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

खरं चित्र जे आहे ते प्रचंड दुर्देवी आहे. मी अनेकवेळी म्हटलंय की, ओबीसी आणि मराठा हे बहुजन होते. त्यांच्यात भांडण होऊ नये असं मी सांगायचे. मी कोणत्याही मंचावर जाऊन कुणाला काही बोलावं असं मी कधी केलं नाही. आपल्या राज्यात सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे ही माझी भावना आहे. पण आता परिस्थिती वेगळी झाली आहे. त्यातून राज्यकर्तेच मार्ग काढू शकतात. दोन्ही समाजाच्या लोकांनी आपले मुद्दे घेऊन मुखमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसले तर चर्चा होऊन त्यातून मार्ग निघेल, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

आपण संविधानाच्या आधीन आहोत. कोणताही समाज संविधानाच्या वर नाही. दोन्ही बाजूचे लोकं एकत्र बसून मार्ग काढला पाहिजे. माघार घेण्याचा प्रश्नच नाही. संविधानात जे लिहिलंय त्या चौकटीत झालं पाहिजे. त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्न नाही. एखाद्या समाजाला न्यूनगंड वाटत असेल तर त्याची दखल सरकारने घेतली पाहिजे, असंही पंकजा मुडे म्हणाल्या.

Follow Us
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी