AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत यांनी माफी मागायलाच हवी, डॉक्टरांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा, भाजप नेत्यानं मुद्दा उचलून धरला…

आंदोलनातल्या मागण्याही चुकीच्या नाहीयेत. संजय राऊत यांनी डॉक्टरांची माफी मागितलीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.

संजय राऊत यांनी माफी मागायलाच हवी, डॉक्टरांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा, भाजप नेत्यानं मुद्दा उचलून धरला...
Image Credit source: social media
| Updated on: Jan 18, 2023 | 3:23 PM
Share

मुंबईः संजय राऊत (Sanjay Raut) यांनी समस्त आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचा, डॉक्टरांचा (Doctors) अपमान केला आहे. त्यांनी या जनतेची माफी मागायलाच पाहिजे, असं वक्तव्य भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलंय. संजय राऊत यांनी कोरोना काळात डॉक्टरांच्या कामाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून समस्त डॉक्टर समूहातर्फे त्यांच्यावर सडकून टीका केली जातेय. हाच मुद्दा भाजपने उचलून धरलाय. डॉक्टरांबद्दल असं वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांनी महाराष्ट्राची माफी मागायलाच पाहिजे, अशी भूमिका आशिष शेलार यांनी मांडली.

आशिष शेलार म्हणाले, ‘ संजय राऊत बेताल, पातळीसोडून, असंबंध बोलतात, हे दुर्दैवी आहे. ज्या डॉक्टरांनी, मेडिकल स्टाफने कोरोना काळात खऱ्या अर्थाने स्वतःचा जीव धोक्यात घालून राज्याची आणि जनतेची सेवा केली. त्यांच्या बद्दल अपमानास्पद बोलयाचं, अहंकाराचा परमोच्च बिंदू यांनी गाठलाय. जनता यांना माफ करणार नाही. डॉक्टरांनी जर आंदोलनाचा इशारा दिला असेल तर त्यांना आमचं समर्थन आहे.

आंदोलनातल्या मागण्याही चुकीच्या नाहीयेत. संजय राऊत यांनी डॉक्टरांची माफी मागितलीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.

संजय राऊत यांचं वक्तव्य काय?

मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना ईडीने पाठवलेल्या नोटिशीसंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सदर वक्तव्य केलं. कोरोना काळात डॉक्टप आणि परिचारिकांनी पळ काढला होता, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. त्यावरून आज त्यांनी स्पष्टीकरणही दिलंय. कोरोना काळात डॉक्टरांची कमतरता होती, असं मला म्हणायचं होतं, असं ते म्हणालेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील प्रकल्पांचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप शिवसेनेतर्फे केला जातोय. त्यावरून आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ खाई त्याला खवखव, उगाच बसून जीभ नाकाला लावण्याचे धंदे उद्धवजींच्या शिवसेनेने करू नयेत.

स्वतःचं सरकार होतं तेव्हा काही केलं नाही. दावोसमध्ये जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोट्यवधींची गुंतवणूक आणली आहे. लाखो मुंबईकरांची स्वप्नपूर्ती होतेय, त्यात मी कुठेय, हे दाखवण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे, त्यासाठीच हे आरोप आहेत. जीभ नाकाला लावण्याचा प्रयत्न करू नका, असा सल्ला आशिष शेलार यांनी दिलाय.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.