AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, लोकल तब्बल अर्धा तास उशिराने, प्रवासी खोळंबले

मध्य रेल्वेची लोकल वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा विस्कळीत झाली आहे. बदलापूर-मुंबई मार्गावर सकाळी बिघाड झाल्याने लाखो चाकरमान्यांचे हाल झाले. लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना कामावर पोहोचायला उशीर झाला.

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, लोकल तब्बल अर्धा तास उशिराने, प्रवासी खोळंबले
| Updated on: Oct 14, 2025 | 9:23 AM
Share

मध्य रेल्वेची लोकल वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. आज सकाळी बदलापूरहून मुंबईकडे येणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऐन सकाळी कामावर जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. यामुळे लोकल गाड्या तब्बल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत झाले.

तांत्रिक बिघाडामुळे लोकल विस्कळीत

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास बदलापूर स्थानकाच्या आसपास तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक कोलमडली आहे. या तांत्रिक अडचणीमुळे अप मार्गावरील मुंबईकडे जाणारी लोकल वाहतुकीचे तीन तेरा वाजले. सकाळी ७ ते ९ या गर्दीच्या वेळेतच हा बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला. यामुळे बदलापूरहून मुंबई, ठाणे, कल्याणकडे जाणाऱ्या अनेक गाड्या जागच्या जागी थांबल्याचे पाहायला मिळाले. तसेच काही गाड्या या अतिशय धीम्या गतीने धावत असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रवाशांना मोठा मनस्ताप

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने बदलापूर, कल्याण, डोंबिवली, ठाणे यांसह विविध रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी झुंबड उडाली आहे. मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने विविध स्थानकात चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रोजच्या वेळेनुसार स्टेशनवर आलेल्या प्रवाशांना लोकल वेळेवर मिळत नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्याची चिंता आणि लोकलच्या वारंवार होणाऱ्या विलंबाचा संताप प्रवाशांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.

संपूर्ण दिवसाचे नियोजन कोलमडले

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलवर अवलंबून असलेल्या नोकरदारांना या विस्कळीत सेवेचा मोठा फटका बसला. ३० मिनिटांहून अधिक विलंबाने लोकल सुरू झाल्याने अनेकांना ऑफिसला पोहोचायला उशीर झाल्याचे पाहायला मिळाले. ही समस्या दररोजची असल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर सोशल मीडियावरून टीका केली आहे. दररोज हाच खोळंबा, रेल्वे कधी सुधारणार? असा सवाल संतप्त प्रवाशांकडून केला जात आहे. लोकल उशिरा सुरु असल्याने अनेक प्रवाशांचे वेळापत्रकच नाही, तर संपूर्ण दिवसाचे नियोजन कोलमडले आहे.

दुरुस्तीचे काम सुरू

दरम्यान हा बिघाड लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने तातडीने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे लवकरात लवकर लोकल सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र पुढील काही तास मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील लोकल सेवा उशिरानेच धावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होणार आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.