AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, लोकल तब्बल अर्धा तास उशिराने, प्रवासी खोळंबले

मध्य रेल्वेची लोकल वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा विस्कळीत झाली आहे. बदलापूर-मुंबई मार्गावर सकाळी बिघाड झाल्याने लाखो चाकरमान्यांचे हाल झाले. लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना कामावर पोहोचायला उशीर झाला.

मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत, लोकल तब्बल अर्धा तास उशिराने, प्रवासी खोळंबले
| Updated on: Oct 14, 2025 | 9:23 AM
Share

मध्य रेल्वेची लोकल वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. आज सकाळी बदलापूरहून मुंबईकडे येणारी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऐन सकाळी कामावर जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. यामुळे लोकल गाड्या तब्बल अर्धा ते पाऊण तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत झाले.

तांत्रिक बिघाडामुळे लोकल विस्कळीत

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास बदलापूर स्थानकाच्या आसपास तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक कोलमडली आहे. या तांत्रिक अडचणीमुळे अप मार्गावरील मुंबईकडे जाणारी लोकल वाहतुकीचे तीन तेरा वाजले. सकाळी ७ ते ९ या गर्दीच्या वेळेतच हा बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला. यामुळे बदलापूरहून मुंबई, ठाणे, कल्याणकडे जाणाऱ्या अनेक गाड्या जागच्या जागी थांबल्याचे पाहायला मिळाले. तसेच काही गाड्या या अतिशय धीम्या गतीने धावत असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रवाशांना मोठा मनस्ताप

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने बदलापूर, कल्याण, डोंबिवली, ठाणे यांसह विविध रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी झुंबड उडाली आहे. मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने विविध स्थानकात चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रोजच्या वेळेनुसार स्टेशनवर आलेल्या प्रवाशांना लोकल वेळेवर मिळत नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्याची चिंता आणि लोकलच्या वारंवार होणाऱ्या विलंबाचा संताप प्रवाशांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे.

संपूर्ण दिवसाचे नियोजन कोलमडले

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलवर अवलंबून असलेल्या नोकरदारांना या विस्कळीत सेवेचा मोठा फटका बसला. ३० मिनिटांहून अधिक विलंबाने लोकल सुरू झाल्याने अनेकांना ऑफिसला पोहोचायला उशीर झाल्याचे पाहायला मिळाले. ही समस्या दररोजची असल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर सोशल मीडियावरून टीका केली आहे. दररोज हाच खोळंबा, रेल्वे कधी सुधारणार? असा सवाल संतप्त प्रवाशांकडून केला जात आहे. लोकल उशिरा सुरु असल्याने अनेक प्रवाशांचे वेळापत्रकच नाही, तर संपूर्ण दिवसाचे नियोजन कोलमडले आहे.

दुरुस्तीचे काम सुरू

दरम्यान हा बिघाड लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने तातडीने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे लवकरात लवकर लोकल सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र पुढील काही तास मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील लोकल सेवा उशिरानेच धावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होणार आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?