AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update: पुढील चार दिवस पावसाचे; महाराष्ट्रासह काही भागांत कुठे हलकासा, तर कुठे वादळी वाऱ्यासह हजेरी

आयएमडीच्या म्हणण्यानुसार, आठवडाभराच्या थंडीनंतर मध्य भारतातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागणार आहे. त्यामुळे हवामान दमट राहणार आहे. पुढील चार दिवस गडगडाटी वादळासह पाऊस कोसळेल, अशी शक्यता आहे.

Weather Update: पुढील चार दिवस पावसाचे; महाराष्ट्रासह काही भागांत कुठे हलकासा, तर कुठे वादळी वाऱ्यासह हजेरी
महाराष्ट्रासह काही भागांत कुठे हलकासा, तर कुठे वादळी वाऱ्यासह हजेरी
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jan 08, 2022 | 6:47 PM
Share

मुंबई : मागील वर्षभरात अधूनमधून रिपरिप सुरु ठेवणाऱ्या पावसाने नवीन वर्षातही तेच सत्र सुरु ठेवले आहे. आज नव्या वर्षांच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाची हजेरी लावली. या पावसाने मुंबई शहरासह उपनगरांमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. उत्तर भारतातील बर्फवृष्टीचा देशाच्या उर्वरित भागात परिणाम झाला असून पुढील चार दिवस पावसाचे असतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे.

हवामान खात्याने काय म्हटलेय?

आयएमडीच्या म्हणण्यानुसार, आठवडाभराच्या थंडीनंतर मध्य भारतातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागणार आहे. त्यामुळे हवामान दमट राहणार आहे. पुढील चार दिवस गडगडाटी वादळासह पाऊस कोसळेल, अशी शक्यता आहे. आजपासून म्हणजेच 8-11 जानेवारीदरम्यान मध्य प्रदेशात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच रविवार ते मंगळवार, 9-11 जानेवारी या कालावधीत छत्तीसगढ आणि महाराष्ट्राच्या विदर्भ परिसरातही अशीच परिस्थिती दिसून येईल. याशिवाय आज पश्चिम मध्य प्रदेश, आज आणि उद्या पूर्व मध्य प्रदेश तसेच सोमवार आणि मंगळवारी छत्तीसगडमध्ये ढगांचा गडगडाट, वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारांचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भारतात 5 दिवसांच्या पावसाचा अंदाज

IMD ने आज मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या मराठवाडा परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. रविवारी मध्य प्रदेश तसेच सोमवार ते बुधवार संपूर्ण विदर्भ आणि छत्तीसगढसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने स्थानिक नागरिकांना हवामान बदलाच्या परिस्थितीबद्दल सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे.

अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील परिस्थितीचा प्रभाव

हवामानातील या बदलाला अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातून वायव्य आणि लगतच्या मध्य भारतामध्ये येणाऱ्या उच्च पातळीची आर्द्रता कारणीभूत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील तीन ते चार दिवस मध्य भारतावर दोन्ही बाजूंनी वाऱ्यांचा संगम सुरू राहील. मध्य पाकिस्तानस्थित पश्चिम विक्षोभ तसेच नैऋत्य राजस्थानवर त्याच्या प्रेरित चक्रीवादळाचा प्रभाव असेल. एकत्रितपणे या प्रणालींमुळे या आठवड्याच्या शेवटी उत्तर आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये दमट वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. (Chance of rain for next four days in some parts including Maharashtra)

इतर बातम्या

Omicron : ओमिक्रॉनची धास्ती! ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्या- एकनाथ शिंदे

‘मुंबई महापालिकेत 500 कोटींचा भ्रष्टाचार’, भाजप आमदाराचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, कायदेशीर कारवाईचाही इशारा

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली