AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री आहे की मक्ख मंत्री? का होतेय एकनाथ शिंदे यांच्यावर ‘ही’ टीका

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली आणि उद्धव ठाकरे यांनी पुढे नेलेली शिवसेना ही निष्ठावंताची शिवसेना आहे.

मुख्यमंत्री आहे की मक्ख मंत्री? का होतेय एकनाथ शिंदे यांच्यावर 'ही' टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 23, 2023 | 6:58 AM
Share

मुंबई : शिवसेनेच्या ( SHIVSENA ) निर्मितीपासून राजकीयदृष्ट्या ज्या काही उलथापालथ झाल्या तरी शिवसेनेने घेतलेल्या रक्तदानाचा वसा याचे नाव जगभर झाले आहे. उद्धव ठाकरे ( UDDHAV THACKAREY ) यांचा २७ जुलै हा वाढदिवस त्यानिमित्त गोरेगाव ( GOREGAON ) येथे २५ हजार बाटल्या रक्तदान केले होते. त्याची नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. एका बाजूला रक्तदानाचा वसा घेऊन आमची माणसे उभी आहेत तर दुसरीकडे रक्तशोषित जी राजकीय परिस्थिती आहे. रक्त शोषणे, रक्त पिपासूपणा आणि त्यातून जे काही वाईट घडत आहे. महिलांवरील अत्याचार किंवा पीडित हा जो काही प्रकार सुरु आहे ते पाहून मन विदीर्ण होते. अशा वेळेला या सत्तापिपासूपेक्षा शिवसेना वेगळी अशी उजळून दिसते, अशी टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत ( ARVIND SAWANT ) यांनी केली.

स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या जन्मदिवस आहे. यानिमित्त उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. शिवसेना आणि रक्तदान शिबीर यांचे नाते अतूट आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस हा आमच्यासाठी ऊर्जा दिवस आहे. त्यांनी आम्हाला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण शिकवले. त्यातूनच शिवसेना उजळून निघाली. उद्धव ठाकरे यांनी जी सर्वसमावेशक भूमिका घेतली आहे. त्याचे प्रकाश आंबेडकर यांनी मनापासून स्वागत केले आहे. त्यामुळे युतीबाबत ज्या काही चर्चा होत असतील तर त्या उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात होत असेल. त्यामुळे युतीचाच निर्णय योग्य वेळी ते जाहीर करतील, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस येथे जाऊन ३० जकार कोटींचे करार केले. पण, त्या कंपन्या महाराष्ट्र्रातीलच आहेत. मग ते तेथे गेले कशाला? दावोसला जाऊन कसला करार केला? हा मुख्यमंत्री आहे की मक्ख मंत्री आहे तेच कळत नाही. निवडणूक आयोगासमोर जो काही निर्णय प्रलंबित आहे तेथे आमचाच विजय होईल. सर्व प्रक्रिया आम्ही कायदेशीररित्या पूर्ण केली आहे. शिवसेनेची घटना आहे. कुठे २० लाख सभासद आणि कुठे ४ लाख, प्रतिज्ञापत्र शून्य. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केली आणि उद्धव ठाकरे यांनी पुढे केलेली शिवसेना ही निष्ठावंताची शिवसेना आहे, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.