AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला आशा आहे की त्यांना वाईट वाटणार नाही’, शिंदे आणि अजितदादांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे. काल काही आमदारांनी अमित शाह यांच्याकडे अजितदादांची तक्रार केल्यानंतर त्यांचे वक्तव्य चर्चेत आहे. एका कार्यक्रमात त्यांनी राज्यातील अनेक मुद्यांवर त्यांचे मत मांडले.

'मला आशा आहे की त्यांना वाईट वाटणार नाही', शिंदे आणि अजितदादांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले?
मुख्यमंत्र्यांचे ते वक्तव्य चर्चेतImage Credit source: गुगल
| Updated on: May 29, 2025 | 11:53 AM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहतात. विकासाचा मुद्दा असो की विरोधी पक्षावर निशाणा साधणे असो फडणवीस खास शैलीत समाचार घेतात. गेल्या 35 महिन्यात त्यांनी भारतीय जनता पक्षाला भक्कम करण्यात आणि त्यांच्या मागील कार्यकाळातील विकास योजनांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवर थेट भाष्य केले. त्यांच्या वक्तव्याची आता राज्यात चर्चा सुरू आहे.

लव जिहाद आडून शोषण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव जिहादवर भाष्य केले. या शब्दावर नेहमी वाद होतो. पण काही जिल्ह्यात प्रेम संबंधाच्या आडून शोषण करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक जिल्ह्यात लव जिहाद ही वास्तविकता आहे. जेव्हा लव जिहादची गोष्ट समोर येते. तेव्हा तुम्हाला वाटतं की ही अतिशयोक्ती आहे. पण काही जिल्ह्यात या घटना घडतात, हे सत्य आहे, असे फडणवीस म्हणाले.

अर्थात प्रत्येक प्रकरणात चिंता व्हावी असे नाही. पण काही पॅटर्न मात्र चिंता निर्माण करणारे आहेत. मी आंतरजातीय विवाह अथवा आंतरधर्मीय लग्नाच्या विरोधात नाही. पण फसवणूक करून मुलीशी लग्न करून तिचे शोषण करण्यात येतो, तेव्हा हा विषय गंभीर होतो, असे फडणवीस म्हणाले. या संदर्भात ज्याविषयी सत्यता समोर आली, ठोस पुरावे हाती आले. त्यावेळी आपण त्यावर बोललो असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मला वाटतं त्यांना वाईट वाटणार नाही

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या सहकार्यांविषयी प्रश्न करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत ते सरकारचा गाडा हाकत आहेत. त्यांच्याविषयी फडणवीस यांना प्रश्न करण्यात आला. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या पैकी कोण चांगल्याप्रकारे व्यक्त होते, संवाद साधते अशी गुगली त्यांना टाकण्यात आली. त्यावेळी त्यांनी साधेपणाने सांगितले की दोघे पण संवाद साधण्यात चांगले नाहीत. मला अपेक्षा आहे की त्यांना माझ्या बोलण्याचे वाईट वाटणार नाही.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.