AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला आशा आहे की त्यांना वाईट वाटणार नाही’, शिंदे आणि अजितदादांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे. काल काही आमदारांनी अमित शाह यांच्याकडे अजितदादांची तक्रार केल्यानंतर त्यांचे वक्तव्य चर्चेत आहे. एका कार्यक्रमात त्यांनी राज्यातील अनेक मुद्यांवर त्यांचे मत मांडले.

'मला आशा आहे की त्यांना वाईट वाटणार नाही', शिंदे आणि अजितदादांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले?
मुख्यमंत्र्यांचे ते वक्तव्य चर्चेतImage Credit source: गुगल
| Updated on: May 29, 2025 | 11:53 AM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहतात. विकासाचा मुद्दा असो की विरोधी पक्षावर निशाणा साधणे असो फडणवीस खास शैलीत समाचार घेतात. गेल्या 35 महिन्यात त्यांनी भारतीय जनता पक्षाला भक्कम करण्यात आणि त्यांच्या मागील कार्यकाळातील विकास योजनांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवर थेट भाष्य केले. त्यांच्या वक्तव्याची आता राज्यात चर्चा सुरू आहे.

लव जिहाद आडून शोषण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव जिहादवर भाष्य केले. या शब्दावर नेहमी वाद होतो. पण काही जिल्ह्यात प्रेम संबंधाच्या आडून शोषण करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक जिल्ह्यात लव जिहाद ही वास्तविकता आहे. जेव्हा लव जिहादची गोष्ट समोर येते. तेव्हा तुम्हाला वाटतं की ही अतिशयोक्ती आहे. पण काही जिल्ह्यात या घटना घडतात, हे सत्य आहे, असे फडणवीस म्हणाले.

अर्थात प्रत्येक प्रकरणात चिंता व्हावी असे नाही. पण काही पॅटर्न मात्र चिंता निर्माण करणारे आहेत. मी आंतरजातीय विवाह अथवा आंतरधर्मीय लग्नाच्या विरोधात नाही. पण फसवणूक करून मुलीशी लग्न करून तिचे शोषण करण्यात येतो, तेव्हा हा विषय गंभीर होतो, असे फडणवीस म्हणाले. या संदर्भात ज्याविषयी सत्यता समोर आली, ठोस पुरावे हाती आले. त्यावेळी आपण त्यावर बोललो असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मला वाटतं त्यांना वाईट वाटणार नाही

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या सहकार्यांविषयी प्रश्न करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत ते सरकारचा गाडा हाकत आहेत. त्यांच्याविषयी फडणवीस यांना प्रश्न करण्यात आला. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या पैकी कोण चांगल्याप्रकारे व्यक्त होते, संवाद साधते अशी गुगली त्यांना टाकण्यात आली. त्यावेळी त्यांनी साधेपणाने सांगितले की दोघे पण संवाद साधण्यात चांगले नाहीत. मला अपेक्षा आहे की त्यांना माझ्या बोलण्याचे वाईट वाटणार नाही.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.