AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राऊत यांचं सरकार कोसळण्याचं ते विधान म्हणजे…; मुख्यमंत्री शिंदे, बावनकुळे, मुनगंटीवार, गायकवाड यांची प्रतिक्रिया काय?

आमदार संजय गायकवाड यांनीही राऊतांवर टीका केली. महविकास अभद्र आघाडीच्या मोर्चात तीन लाखांच्या टार्गेट ऐवजी तीस हजारही लोक जमले नाहीत.

राऊत यांचं सरकार कोसळण्याचं ते विधान म्हणजे...; मुख्यमंत्री शिंदे, बावनकुळे, मुनगंटीवार, गायकवाड यांची प्रतिक्रिया काय?
मुख्यमंत्री शिंदे, बावनकुळे, मुनगंटीवार, गायकवाड यांची प्रतिक्रिया काय?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 18, 2022 | 8:23 AM
Share

मुंबई: महाविकास आघाडीचा काल विराट महामोर्चा पार पडला. या महामोर्चाची आझाद मैदानात सांगता झाली. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीसांचं सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असा दावा केला. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. सत्ताधाऱ्यांनीही संजय राऊत यांच्या भविष्यवाणीवर थेट प्रतिक्रिया दिली आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊत यांच्या भाकितावर प्रतिक्रिया देत त्यांची भविष्यवाणी खोडून काढली आहे.

आमचं सरकार भक्कम सरकार आहे. ते डबल इंजिन सरकार आहे. कोणी म्हणाले एक महिन्यात हे सरकार पडेल. आता पाच महिने झाले हे सरकार मजबूत आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. लफंगे कोण आहेत? लफंगेगिरी कोणी केली हे सर्वांना माहीत आहे. खुर्ची मिळवण्यासाठी आणि बाळासाहेबांचे विचार सोडून कोणी काय केले हे सर्वानी पाहिले आहे. त्यामुळे मला जास्त बोलावसं वाटत नाही, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राऊत यांच्या त्या विधानाचा समाचार घेतला आहे. त्यांचे राहिलेले खासदार, आमदार हे केव्हा जातील याची त्यांना भीती आहे म्हणून अशा प्रकारची टीका केली जात आहे. शिंदे-फडणवीस सरकारने 164 आमदारांचं बहुमत दोन वेळा सिद्ध केलं आहे. जर संजय राऊत यांना संशय असेल आणि बहुमत परत सिद्ध करायचं असेल तर नागपूर हिवाळी अधिवेशनात त्यांनी पुन्हा प्रस्ताव आणावा, असं आव्हानच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.

जर त्यांनी पुन्हा प्रस्ताव आणला तर आता आमचे आमदार 164 आहेत. ही संख्या वाढून 184 वर जाईल, असा दावा करतानाच त्यामुळे सत्ता गेल्यापासून घाबरलेल्या अवस्थेत वेगवेगळी कारण सांगितली जात आहेत, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला.

विरोधी पक्षाचा मूळ गाभा आहे, त्या गाभ्यापासून विरोधी पक्ष दूर गेला आहे. जनता शेवटी निवडणुकीत निर्णय करत असते. शब्दाचा बाजार मांडून ज्या पद्धतीने हे खेळ करत आहेत त्यावरून येणाऱ्या निवडणुकीत जनता मतदानाच्या माध्यमातून यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हा माझा दावा आहे, असंही ते म्हणाले.

2024मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा प्रचंड मोठा विजय आम्हाला प्राप्त होईल. ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत आम्ही सर्व जागा जिंकू, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

संजय राऊत हे मंगेरीलाल आणि गणपतवाणी यांचे वंशज आहेत. जनतेने 2019 मध्ये भाजप आणि शिवसेना युतीला निवडून दिले होते. जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला झिडकारले होते. महाराष्ट्रात आणि देशात त्यांची सत्ता होती मात्र कुठलाही विकास त्यांनी केला नाही.

जनतेने त्यांना परमनंट सुट्टी दिलेली आहे. त्या आधारावर जर संजय राऊत फेब्रुवारी महिन्यात आमची सत्ता येईल असं म्हणत असेल तर हे गणपतवाणी आणि मुंगेरीलाल यांचे वंशजच आहे, असं म्हणावं लागेल, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

आमदार संजय गायकवाड यांनीही राऊतांवर टीका केली. महविकास अभद्र आघाडीच्या मोर्चात तीन लाखांच्या टार्गेट ऐवजी तीस हजारही लोक जमले नाहीत. त्यामुळे जनमत त्यांच्यासोबत किती आहे यावरून दिसतेय.

लोकांना रात्री स्वप्नं पडतात. मात्र, संजय राऊतां दिवसा स्वप्नं पडतात. दिवसाचे स्वप्न कधी साकार होत नसतात. आमचं सरकार पूर्ण काळ टिकेल. पोकळ भविष्यवाणी कधी खरी होत नसते, अशी टीकाही त्यांनी केली.

Follow Us
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या...
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या....
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत.