‘आम्हाला एकटंच लढू द्या, 2024 ला राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री विराजमान व्हायला पाहिजे’

Congress | काँग्रेस सोडून गेलेल्या अनेक नेत्यांना आता पश्चाताप होत आहे. ते आता घरवापसी करत आहेत. 2024 मध्ये राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री विराजमान झाला पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांनी झटलं पाहिजे

'आम्हाला एकटंच लढू द्या, 2024 ला राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री विराजमान व्हायला पाहिजे'
पृथ्वीराज चव्हाण आणि भाई जगताप
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 3:17 PM

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा सूर काँग्रेसकडून पुन्हा एकदा आळवण्यात आला आहे. भाजपला सोडचिठ्ठी देऊन ‘घरवापसी’ करणाऱ्या सुनील देशमुख यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात भाई जगताप आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसने (Congress) स्वतंत्रपणेच निवडणुका लढवाव्यात, असे मत व्यक्त केले. (Congress should contest election independently says Bhai Jagtap and Prithviraj Chavan)

या कार्यक्रमाला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील हेदेखील उपस्थित होते. यावेळी भाई जगताप यांनी काँग्रेसने स्वबळावर लढावे, असे मत बोलून दाखवले. तुम्ही महाराष्ट्रातील परिस्थिती बघत आहात. काँग्रेसला तिसरा पक्ष म्हटले जाते. कोरोना काळात तुम्ही काँग्रेसचे काम पाहिले असेल. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्हाला एकटं लढू द्या, देखते है किसमे कितना है दम, असे भाई जगताप यांनी म्हटले. तर पृथ्वीराज चव्हाण यांनीही 2024 मध्ये काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा दावा केला. काँग्रेस सोडून गेलेल्या अनेक नेत्यांना आता पश्चाताप होत आहे. ते आता घरवापसी करत आहेत. 2024 मध्ये राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री विराजमान झाला पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांनी झटलं पाहिजे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यामुळे मला तिकीट मिळालं नाही: सुनील देशमुख

काँग्रेसमध्ये घरवापसी केलेल्या सुनील देशमुख यांनी भाजपच्या नेत्यांवर टीकास्त्र डागले. मी भाजपमध्ये गेलो पण तिथे माझं मन रमलं नाही. तालुक्यातील सर्व सहकारक्षेत्र माझ्याकडे असताना मला तिकीट नाकारण्यात आले. मी कोणाचं नाव घेत नाही. पण पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचं पक्षात वर्चस्व असल्याने मला तिकीट मिळाले नाही, अशी टीका सुनील देशमुख यांनी केली.

भाजपचा दुटप्पी चेहरा लोकांसमोर आणला पाहिजे: अशोक चव्हाण

भाजपचा दुटप्पी चेहरा लोकांसमोर आणला पाहिजे, असे वक्तव्य राज्याचे मंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केले. राज्यात भाजपची सत्ता येईल, असे वाटल्यामुळे अनेकजण तिकडे गेले. पण आता या नेत्यांची भाजपमध्ये अडचण होत असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

2024मध्ये मुख्यमंत्री कुणाचा होणार?, प्रफुल्ल पटेलांनी सांगितला फॉर्म्युला; पटोले, राऊतांना शिकवला शहाणपणा!

यापुढे दिल्लीच्या तख्तासंदर्भात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल; संजय राऊत यांचं मोठं विधान

राहुल गांधी प्रामाणिक आणि उमदं नेतृत्व, त्यांचं स्वप्न साकार होवो, संजय राऊतांकडून शुभेच्छा

(Congress should contest election independently says Bhai Jagtap and Prithviraj Chavan)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.