AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमध्ये काँग्रेसचे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी बॅनर

Congress, BJP and ShivSena : राज्यातील बॅनरवरमध्ये कल्याणमधील पोस्टर चांगलेच चर्चेत आले आहे. कारण या ठिकाणी काँग्रेसने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले आहे. परंतु त्यामागील कारणही वेगळेच आहे.

कल्याणमध्ये काँग्रेसचे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी बॅनर
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 18, 2023 | 4:26 PM
Share

सुनील जाधव, डोंबिवली : बँनरवार राज्यातील राजकारणात सुरुच आहे. आता कल्याणमधील एक बॅनर चांगलेच चर्चेत आले आहे. कल्याणमध्ये चक्क काँग्रेसने भारतीय जनता पक्षाचे नेते अन् राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले आहे. यामुळे हे बॅनर चर्चेत आले आहे. परंतु फडणवीस यांचे स्वागत काँग्रेसने करण्यामागे कारणही तसेच आहे. ‘कही पे निगाहे कहीपे निशाना’, असा हा प्रकार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे येणारे-जाणारे लोकही या बॅनरची चर्चा करत असतात.

काँग्रेसने केल फडणवीस यांचे स्वागत

कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लवकरच आगमन होणार आहे. फडणवीस यांच्या स्वागताचे बॅनर काँग्रेसकडून लाववण्यात आले आहे. मात्र यावर येताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनाही घेऊन या… असा संदेश लिहिण्यात आला आहे. काँग्रेसने या माध्यमातून बाळासाहेबांच्या सेनेला आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री देसाई यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय.

आमदार भोईर यांनी घेतला काँग्रेसचा समाचार

कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुपचूप कोण कोण भेटायला येत? यासंदर्भात थेट भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, पालकमंत्री हरवले नाहीत. त्यांच्याकडे दोन चार्ज आहेत. एक ठाणे जिल्हा आणि दुसरा सातारा. त्यामुळे ठाणे जिल्ह्याला वेळ कमी दिला गेला असेल पण हरवले अस बोलणं योग्य नाही असे विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केलंय.

मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेसचे लोकही येतात

मंत्री आहेत ते…कुठे जाणार आहेत? नियोजन समितीची बैठक असते तेव्हा ते भेटतच असतात. दोन चार्ज असल्यामुळे त्यांच्याकडून वेळ कमी दिला जातो हे मान्य आहे, असेही ते म्हणाले. जे लोक काम करतात त्यांच्यात उगाच लुडबुड करू नको, असा टोलाही विश्वनाथ भोईर यांनी काँग्रेसला लगावला आहे. ज्या लोकांचं ध्येय राज्याचा, मतदारसंघाचा विकास करणे आहे, अशा लोकांना डिवचून उपयोग नाही. उलट अशा लोकांकडून कामे करुन घ्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामाचे माणूस आहेत. मी नेहमी बघतो मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाची माणसेही गुपचूप येत असतात अन् कामे करून घेतात. मग हा दुटप्पीपणा कशाला? असा सवालही भोईर यांनी उपस्थित केलाय.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.