AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याणमध्ये काँग्रेसचे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी बॅनर

Congress, BJP and ShivSena : राज्यातील बॅनरवरमध्ये कल्याणमधील पोस्टर चांगलेच चर्चेत आले आहे. कारण या ठिकाणी काँग्रेसने भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले आहे. परंतु त्यामागील कारणही वेगळेच आहे.

कल्याणमध्ये काँग्रेसचे देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी बॅनर
Image Credit source: tv9
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 18, 2023 | 4:26 PM
Share

सुनील जाधव, डोंबिवली : बँनरवार राज्यातील राजकारणात सुरुच आहे. आता कल्याणमधील एक बॅनर चांगलेच चर्चेत आले आहे. कल्याणमध्ये चक्क काँग्रेसने भारतीय जनता पक्षाचे नेते अन् राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले आहे. यामुळे हे बॅनर चर्चेत आले आहे. परंतु फडणवीस यांचे स्वागत काँग्रेसने करण्यामागे कारणही तसेच आहे. ‘कही पे निगाहे कहीपे निशाना’, असा हा प्रकार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे येणारे-जाणारे लोकही या बॅनरची चर्चा करत असतात.

काँग्रेसने केल फडणवीस यांचे स्वागत

कल्याणमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लवकरच आगमन होणार आहे. फडणवीस यांच्या स्वागताचे बॅनर काँग्रेसकडून लाववण्यात आले आहे. मात्र यावर येताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनाही घेऊन या… असा संदेश लिहिण्यात आला आहे. काँग्रेसने या माध्यमातून बाळासाहेबांच्या सेनेला आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री देसाई यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय.

आमदार भोईर यांनी घेतला काँग्रेसचा समाचार

कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गुपचूप कोण कोण भेटायला येत? यासंदर्भात थेट भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, पालकमंत्री हरवले नाहीत. त्यांच्याकडे दोन चार्ज आहेत. एक ठाणे जिल्हा आणि दुसरा सातारा. त्यामुळे ठाणे जिल्ह्याला वेळ कमी दिला गेला असेल पण हरवले अस बोलणं योग्य नाही असे विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केलंय.

मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेसचे लोकही येतात

मंत्री आहेत ते…कुठे जाणार आहेत? नियोजन समितीची बैठक असते तेव्हा ते भेटतच असतात. दोन चार्ज असल्यामुळे त्यांच्याकडून वेळ कमी दिला जातो हे मान्य आहे, असेही ते म्हणाले. जे लोक काम करतात त्यांच्यात उगाच लुडबुड करू नको, असा टोलाही विश्वनाथ भोईर यांनी काँग्रेसला लगावला आहे. ज्या लोकांचं ध्येय राज्याचा, मतदारसंघाचा विकास करणे आहे, अशा लोकांना डिवचून उपयोग नाही. उलट अशा लोकांकडून कामे करुन घ्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामाचे माणूस आहेत. मी नेहमी बघतो मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाची माणसेही गुपचूप येत असतात अन् कामे करून घेतात. मग हा दुटप्पीपणा कशाला? असा सवालही भोईर यांनी उपस्थित केलाय.

Follow Us
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या PRO बाबत
एका महिन्यातच कोट्यावधींची उलाढाल अन्... आदिती तटकरेंच्या दिवंगत PRO बाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख...
मतदार यादीत नाव आलं नसेल तर आत्ताच करा तक्रार; अखेरची तारीख... 2 कोटी 7 लाख लोकांची नावे वगळली
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय?
यंदा गणेशोत्सवात डीजे वाजवता येणार की नाही? नवे नियम काय? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले...