AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बापरे, मलनिस्सारण वाहिन्यांच्या पाण्यात कोरोना विषाणू; पालिका म्हणते, मुंबईकरांना धोका नाही!

मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात मुंबई महापालिकेला यश मिळाले असले तरी मुंबईतून कोरोना संसर्ग पूर्णपणे हद्दपार झालेला नाही. (Coronavirus RNA found in sewage samples in mumbai, says ICMR study)

बापरे, मलनिस्सारण वाहिन्यांच्या पाण्यात कोरोना विषाणू; पालिका म्हणते, मुंबईकरांना धोका नाही!
| Updated on: Dec 16, 2020 | 11:12 AM
Share

मुंबई: मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात मुंबई महापालिकेला यश मिळाले असले तरी मुंबईतून कोरोना संसर्ग पूर्णपणे हद्दपार झालेला नाही. आता तर मुंबईतील मलनिस्सारण वाहिन्यांच्या पाण्यातही कोरोनाचे विषाणू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परंतु, त्यामुळे मुंबईकरांना कोणताही धोका नसल्याचं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिलं आहे. मात्र, आयसीएमआरच्या अहवालातून झालेल्या या धक्कादायक खुलाश्यामुळे मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. (Coronavirus RNA found in sewage samples in mumbai, says ICMR study)

मुंबईमध्ये एकीकडे कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुंबईमधील मलनिस्सारणाच्या पाण्यात कोरोनाचा विषाणू आढळून आल्याचे समोर आले आहे. आयसीएमआरने मुंबईमधून सहा ठिकाणी नमुने गोळा केले होते. त्या सर्वच ठिकाणी कोरोना विषाणू असल्याचे सामोर आले आहे. मात्र पालिकेकडून मलनिस्सारण वाहिनीच्या पाण्यावर प्रक्रिया करून समुद्रात सोडले जाते. यामुळे मुंबईकरांना धोका नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

आयसीएमआरचा सर्व्हे काय सांगतो?

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरने मुंबईत वडाळा, धारावी, कुर्ला, गोवंडीच्या शिवाजी नगर, मालाड, कांजूरमार्ग या सहा ठिकाणी सर्व्हे करून त्याठिकाणच्या मलनिसारण वाहिनींच्या पाण्यांचे नमुने गोळा केले होते. त्यात १६ मार्चच्या आधी घेतलेल्या नमुन्यात कोरोना विषाणू आढळून आला नव्हता. मात्र ११ ते २२ मे दरम्यान घेण्यात आलेल्या नमुन्यात कोरोना विषाणू आढळून आल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.

का करण्यात आला सर्व्हे?

कोरोना हा विषाणू नवीन असल्याने त्यावर सर्वप्रकारे अभ्यास केला जात आहे. सुरुवातीला ज्या नागरिकांना याची लागण झाली, त्यांच्या मलातून हा व्हायरस मलनिस्सारण वाहिनीत गेला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाबाधिताच्या मलातून हा विषाणू मलनिस्सारण वाहिन्यात गेला असावा त्यामुळे मलनि:स्सारण वाहिन्यांत उतरणाऱ्या, मलनिस्सारणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याची लागण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली गेली होती. त्यानुसार आयसीएमआरने याबाबत अभ्यास सुरु केला होता. त्या अभ्यासातून मलनिस्सारण वाहिन्यांमध्येही कोरोना विषाणू जिवंत राहू शकतो हे समोर आले आहे. (Coronavirus RNA found in sewage samples in mumbai, says ICMR study)

मुंबईकरांना धोका नाही

मुंबईत सहा ठिकाणी घेण्यात आलेल्या नमुन्यात कोरोना विषाणू आढळल्याचे म्हटले आहे. त्याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, असा अहवाल आमच्यापर्यंत अद्याप आलेला नाही, असा अहवाल आला असल्यास हा अहवाल जुना असेल. मुंबई महापालिका मलनिस्सारण वाहिन्यांमधील पाण्यावर प्रक्रिया करते. प्रक्रिया केलेले पाणी समुद्रात सोडण्यात येते. या पाण्याचा मुंबईकर नागरिकांशी थेट संपर्क येत नाही. यामुळे मुंबईकरांना याचा धोका नाही. मलनिस्सारण वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची, सफाई कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येते. त्यात सुमारे एक टक्के कर्मचारीच पॉझिटिव्ह आढळतात. यामुळे भीतीचे काहीही कारण नाही, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. (Coronavirus RNA found in sewage samples in mumbai, says ICMR study)

संबंधित बातम्या:

इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार, 1000 रुग्ण आढळल्याने खळबळ

कोरोनातून बरे झाल्यानंतरही नव्याच आजाराचं संकट; जाणून घ्या, लक्षणे आणि उपचार?

कोरोना लसनिर्मिती ते लसीकरण, जाणून घ्या 3 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं

(Coronavirus RNA found in sewage samples in mumbai, says ICMR study)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.