AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी: मुंबईत कोरोनाचा उद्रेक, एकाच इमारतीत 22 रुग्ण; कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची भीती

पालिकेने घरकामासाठी येणाऱ्या महिलांनाही सोसायटीत जाण्यास मज्जाव केला आहे. या सोसायटीत कम्युनिटी किचन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. | Coronavirus in Mumbai

मोठी बातमी: मुंबईत कोरोनाचा उद्रेक, एकाच इमारतीत 22 रुग्ण; कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची भीती
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Apr 08, 2021 | 8:43 AM
Share

मुंबई: देशातील कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत दिवसागणिक कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक वाढताना दिसत आहे. मुंबईच्या चेंबूर परिसरातील एका इमारतीत राहणाऱ्या 22 लोकांचा एकाचवेळी कोरोनाची लागण झाली आहे. सिंधी सोसायटी परिसरात हा प्रकार घडला. त्यामुळे चेंबूर परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सिंधी सोसायटीत जवळपास 506 लोक वास्तव्याला आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Coronavirus spread in Mumbai chembur sindhi society)

या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आता वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. पालिकेने ही इमारत आणि सिंधी सोसायटी पूर्णपणे सील केली आहे. तसेच पालिकेने घरकामासाठी येणाऱ्या महिलांनाही सोसायटीत जाण्यास मज्जाव केला आहे. या सोसायटीत कम्युनिटी किचन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईतील कोरोना स्थिती?

मुंबईतही आज दिवसभरातील वाढलेला कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 10 हजार 428 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 6 हजार 7 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आज दिवसभरात 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 16 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 14 पुरुष तर 9 महिलांचा समावेश आहे.

मुंबई जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांचा दर 80 टक्के झाला आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता 35 दिवसांवर येऊन ठेपलाय. 31 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत मुंबईतील कोविड वाढीचा दर 1.91 टक्के झाला आहे.

राज्यात कोरोनाचा उद्रेक, 24 तासांत 60 हजार रुग्ण

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. पण राज्यातील कोरोनाचा वाढता प्रसार काही थांबण्याचं नाव घेत नाही. आज दिवसभरात राज्यात तब्बल 59 हजार 907 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 322 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ही आतापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची स्थिती किती विदारक बनत चालली आहे, याचा अंदाज येऊ शकतो.

संबंधित बातम्या:

Maharashtra Corona Update : चिंताजनक; दिवसभरात 60 हजाराच्या घरात रुग्ण, मृतांचा आकडाही 300 पार

कोरोना झालाय, पण घरीच राहून उपचार घ्यायचेत , मग 25 हजाराच्या बाँडवर सही करा

कोरोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी, एप्रिल अखेरपर्यंत रुग्णसंख्या 12 लाखांवर जाणार; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून खुलासा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसमोर ‘धारावी पॅटर्न’ही फोल?; मुख्यमंत्र्यांनी केलं ‘हे’ विधान

(Coronavirus spread in Mumbai chembur sindhi society)

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.