AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर 80 हजार फेक अकाऊंट्स

मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी 80 हजार पेक्षा अधिक फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आले होते (Facebook fake accounts)

मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी सोशल मीडियावर 80 हजार फेक अकाऊंट्स
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Oct 06, 2020 | 1:52 PM
Share

मुंबई : मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी 80 हजार पेक्षा अधिक फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आले होते (Facebook fake accounts), असा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशावर सायबर सेलने आयटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करुन अधिक चौकशी सुरु केली आहे (Facebook fake accounts).

“मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी सुरु असलेल्या अभियानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता सायबर सेल या प्रकरणाची अधिक चौकशी सुरु करत आहे”, असं मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा 14 जून रोजी मृत्यू झाला. राहत्या घरात सुशांतचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर सुशांतची आत्महत्या नसून हत्या झाली आहे, अशा चर्चा होऊ लागल्या आणि बरेच दिवस सोशल मीडियावर सुशांतबद्दल हॅशटॅगही टॉप ट्रेण्डमध्ये होता. यावर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने चौकशी केली असता हे सर्व फेक अकाऊंट्सच्या माध्यमातून सुरु असल्याचे समोर आले आहे.

परदेशातून चालवले जात आहेत फेक अकाऊंट्स

“सर्वाधिक फेक अकाऊंट्सचा प्रॉक्सी सर्व्हर हा परदेशातील आहे. सायरबर सेलच्या अहवालात समजले की, मुंबई पोलिसांच्या विरोधात केलेल्या पोस्ट इटली, जपान, पोलँड, स्लोवेनिया, इंडोनेशिया, तुर्की, थायलँड, रोमानियासारख्या इतर देशातून केल्या आहेत”, अस पोलीस आयुक्तांनी सांगितले.

“फेक अकाऊंट्सची संख्या हजारोमध्ये असू शकते. आम्ही सध्या हे संबंधित आकडे एकत्र करत आहे. या फेक अकाऊंट्सच्या माध्यामातून गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. आम्हाला याबद्दलची सूचना मिळाली होती. त्यानंतर सायबर सेलला याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते”, असंही आयुक्तांनी सांगितले.

सायबर सेलला चौकशी दरम्यान आढळून आले की, हजारोंच्या संख्येत फेक अकाऊंट्स तयार करुन मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पोलीस आयुक्तांवर आक्षेपार्ह कॉमेंट्स केल्या आणि त्यांना ट्रोल केले गेले. यासाठी इन्स्टाग्रामपासून इतर सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. प्रत्येक आक्षेपार्ह पोस्ट आणि कॉमेंट्समध्ये मुंबई पोलीस आणि सुशांत सिंह राजपूतच्या हॅशटॅगचा वापर केला गेला, अशी माहितीही सायबर सेलच्या चौकशीतून समोर आली आहे.

“सोशल मीडियावर हजारोंच्या संख्येत फेक अकाऊंट्स आहेत. जे मुंबई पोलीस आयुक्तांना ट्रोल करतात. या प्रकरणात आयटी अॅक्ट सेक्शन 67 नुसार गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी 2 सप्टेंबरला एका संशयितावर गुन्हा दाखल केला होता. त्याने ट्विटरवर पोलीस आयुक्तांचा मॉर्फ फोटो तयार केला होता”, असं डीसीपी रश्मी यांनी सांगितले.

सुशांतच्या मृत्यूनंतर तयार करण्यात आलेल्या अकाऊंट्सवर विशेष नजर

“सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नजर ठेवा आणि मुंबई पोलिसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट असणाऱ्या अकाऊंट्सची डीटेल्स सायबर सेलकडे सोपवा. विशेष करुन अशा अकाऊंट्सवर नजर ठेवा जे तीन महिन्यापूर्वी सुशांतच्या मृत्यूनंतर सुरु करण्यात आले आहे. पोलिसांनीही संदिग्ध अकाऊंट्स ब्लॉक केले आहेत”, असं सायबर पोलिसांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

या हॅशटॅगचा वापर जास्त

“पोलिसांनी चौकशी दरम्यान पाहिले की, पोलिसांना बदनाम करण्यासाठी ट्वीटर, इन्स्टाग्राम आणि फेसबूकसह इतर सौशल मीडिया प्लॅटफॉर्मवर #JusticeForSSR and #SushantConspiracyExposed #justiceforsushant #sushantsinghrajput आणि #SSR चा वापर केलेला आहे”, असंही पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी ज्या फेक अकाऊंट्सच्या विरोधात आयटी अॅक्टद्वारे गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये 5 वर्षापर्यंत जेल आणि पाच ते 10 लाख रुपयापर्यंतचा दंड आहे.

संबंधित बातम्या :

Mumbai | मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं षडयंत्र – मुंबई पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद

Sharad Pawar | शरद पवार आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यात महत्त्वाची चर्चा

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ