AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बटेंगे तो कटेंगे’, योगींच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीस यांचे प्रथमच भाष्य, थेट म्हटले…

devendra fadnavis interview: 'एक है तो सेफ' हा मोदींचा महामंत्र म्हटले, कारण काँग्रेस आणि महाविकास आघाडी समाजाला वाटत आहे. त्यांचा भारत जोडो त्यांच्या हातातील लाल संविधानप्रमाणे आहे. त्या लाल संविधानमध्ये वरती कव्हर होते, आता कोरे कागज होते. ते सर्व माध्यमांनी दाखवले. त्यानंतर त्यांनीही हे मान्यही केले.

'बटेंगे तो कटेंगे', योगींच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीस यांचे प्रथमच भाष्य, थेट म्हटले...
| Updated on: Nov 15, 2024 | 11:06 AM
Share

Devendra Fadnavis Interview: समाजाला वाटण्याचे काम काँग्रेस आणि महाविकास आघाडीने केले आहे. त्यामुळे ही निवडणूक एक युद्धच आहे. भारताचा इतिहास पाहिल्यास जेव्हा, जेव्हा देश जाती आणि प्रांतात वाटला गेला तेव्हा, तेव्हा देशाचे तुकडे झाले, देशातील लोक कापले गेले. ‘बटेंगे तो कटेंगे‘ हा देशाचा इतिहास राहिला आहे. त्याचीच आठवण ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेतून योगी आदित्यनाथ यांनी करुन दिली. या घोषणेत काहीच चुकीचे नाही, असे भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

पंकजा मुंडे, अजित पवार यांच्या विरोधावर…

योगीजी यांच्या या वक्तव्यावर तुमच्यासोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले या घोषणेला जागा नाही. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे लोक जनतेचे सेंटेमेंट समजू शकले नाही. या घोषणेचा अर्थ समजू शकले नाही किंवा बोलताना त्यांना वेगळे काही सांगायचे आहे आणि ते वेगळे काही सांगून गेले. अजित पवार यांचा विचार केला तर ते आतापर्यंत हिंदू विरोधी असलेल्या विचारात राहिले.

त्यांची धर्मनिरपक्षेतेची व्याख्या हिंदू विरोधला म्हणजे धर्मनिरपक्षेता होती. त्यांना जनतेचे कल समजून घेण्यास थोडा वेळ लागणार आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा अर्थ समाजाला एकत्र ठेवणे आहे. त्यात काहीच चुकीचे नाही, असे आपणास वाटते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

‘एक है तो सेफ’ हा महामंत्र

‘एक है तो सेफ’ हा मोदींचा महामंत्र म्हटले, कारण काँग्रेस आणि महाविकास आघाडी समाजाला वाटत आहे. त्यांचा भारत जोडो त्यांच्या हातातील लाल संविधानप्रमाणे आहे. त्या लाल संविधानमध्ये वरती कव्हर होते, आता कोरे कागज होते. ते सर्व माध्यमांनी दाखवले. त्यानंतर त्यांनीही हे मान्यही केले. आम्ही असेच जाती-जातीत वाटले गेलो होतो. त्यांचा भारत जोडो नाव असेच आहे, त्यांचे भारत जोडो सर्व संघटना तोडणे, असे आहे.

Follow Us
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.