AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पूर आणि दरडग्रस्तांना तातडीने रोख मदत करा; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

कोकणासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूर आला आहे. तर काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांना तातडीने रोख रक्कम देऊन आर्थिक मदत करा. (devendra fadnavis)

पूर आणि दरडग्रस्तांना तातडीने रोख मदत करा; देवेंद्र फडणवीस यांची मागणी
Devendra Fadnavis
| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 1:34 PM
Share

मुंबई: कोकणासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूर आला आहे. तर काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांना तातडीने रोख रक्कम देऊन आर्थिक मदत करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (devendra fadnavis demand maharashtra government to help flood affected people)

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र विशेषत: महाडनजिक घडलेल्या घटना पाहता तातडीची मदत करण्यात यावी. तसेच नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत द्यायला हवी. पिण्याचे पाणी, अन्न, कोरोनाचा कालखंड पाहता आरोग्य सुविधा या बाबी प्राधान्यक्रमात असल्याच पाहिजेत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘रिस्क असेसमेंट‘ तयार करा

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागात सातत्याने येणारी संकटं पाहता थोडा दूरगामी विचार सुद्धा राज्य सरकारने करण्याची गरज आहे. तळिये या गावात घरे नव्याने पण सुरक्षित ठिकाणी बांधून सर्व नागरी सुविधा नागरिकांना निर्माण करून द्याव्यात. असे करताना धोकादायक क्षेत्राबाहेर हे पुनर्वसन असावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. इतर धोकादायक गावे तत्काळ ओळखून, त्यासाठीचे सर्वेक्षण तातडीने करण्यात यावे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये ‘रिस्क असेसमेंट‘ तातडीने करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी फडणवीसांनी केली.

कोकणासाठी स्वतंत्रं आपत्ती व्यवस्थापन असावं

कोकणची भौगोलिक स्थिती आणि सातत्याने येणारी संकटं पाहता कोकणासाठी स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्यात यावी. विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात त्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

76 लोकांचा मृत्यू

दरम्यान, राज्यात अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, रायगड, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे, सातारा सांगली, मुंबई उपनगरे असे नऊ जिल्हे बाधित झाली आहेत. अतिवृष्टीमुळे कोल्हापूरात 209, सांगली 92, सातारा 120 आणि पुण्यात 421 गावे बाधित झाली आहेत. राज्यात आतापर्यंत 76 लोकांचा मृत्यू झाला आहे. विविध दुर्घटनेत आतापर्यंत 59 लोक बेपत्ता आहेत. तर 90 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे. या दुर्घटनांमध्ये माणसंच नाही तर जनावरेही दगावली आहेत. आतापर्यंत विविध दुर्घटनेत 75 जनावरे दगावली आहेत.

दरडी कुठे कुठे कोसळल्या?

राज्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. साताऱ्यातील वाई तालुक्यात कोंडविडे आणि मौजेघर, महाडमध्ये तळीये, पोलादपूरमध्ये साखर सुतारवाडी आणि केवनाळे आणि पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबर्ली आणि ढोकवळी येथे दरडी कोसळल्या आहेत. घाटातही दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे घाट बंद करण्यात आले आहेत. रस्त्यावर माती आल्याने ताबडतोब माती काढण्याचं काम सुरू आहे. (devendra fadnavis demand maharashtra government to help flood affected people)

संबंधित बातम्या:

पूर आणि दरडीमुळे राज्यात 76 मृत्यू, 59 बेपत्ता, 90 हजार लोकांचं स्थलांतर, 75 जनावरे दगावली: अजित पवार

Maharashtra Rain Landslides LIVE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव हेलिकॉप्टरमधून महाडकडे रवाना

Ambeghar landslide : 35 तासांनी दोन म्हशी बाहेर, यंत्रणा पोहोचणं अशक्य, टीव्ही 9 चा प्रतिनिधी 4 तास चालत आंबेघरमध्ये

(devendra fadnavis demand maharashtra government to help flood affected people)

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.