विधानसभेनंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकांचा प्लॅन फडणवीस यांनी केला उघड

Devendra Fadnavis First Interview after cm: विधानसभा निवडणुकीत आमच्यासोबत तीन मोठे पक्ष होतो. त्यामुळे त्यांना देण्यासाठी आमच्याकडे जागा नव्हत्या. त्यामुळे राज ठाकरे स्वतंत्र लढले. त्यांना या निवडणुकीत मते चांगले मिळाली. त्यांचे आणि आमचे विचार जुळतात.

विधानसभेनंतर आता महानगरपालिकेच्या निवडणुकांचा प्लॅन फडणवीस यांनी केला उघड
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Dec 06, 2024 | 6:40 PM

Devendra Fadnavis First Interview after cm: विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाची सूत्र घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महानगरपालिका निवडणुकीचा प्लॅन सांगितला. लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेत मिळलेल्या मोठ्या यशामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पुढील निवडणुकींची तयारी केली जात असल्याचे संकेत दिले. या निवडणुकीत राज ठाकरे यांनी सोबत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांच्यावर म्हणाले…

निवडणुकांसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता. त्याचा फायदा आम्हाला झाला तसेच त्यांचा पक्षालाही झाला आहे. विधानसभेत त्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी पक्ष काढला आहे. त्यामुळे त्यांनाही निवडणुका लढवाव्या लागत आहे. त्यांनी निवडणुका लढवल्या नाही तर पक्ष कसा चालणार?

विधानसभा निवडणुकीत आमच्यासोबत तीन मोठे पक्ष होतो. त्यामुळे त्यांना देण्यासाठी आमच्याकडे जागा नव्हत्या. त्यामुळे राज ठाकरे स्वतंत्र लढले. त्यांना या निवडणुकीत मते चांगले मिळाली. त्यांचे आणि आमचे विचार जुळतात. त्यांना आमच्यासोबत ठेवण्यात आम्हाला रस आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे तेथे तेथे त्यांच्याशी युती करू, असे फडणवीस यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

या निवडणुका होणार

स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत, त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणे चुकीचे आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण रखडले आहे. त्यासंदर्भात मी कालच वकिलांशी बोललो. या प्रकरणाची याचिकेवर लवकर सुनावणी व्हावी, यासाठी प्रयत्न करण्याचे त्यांना सांगितले. सर्वोच्च न्यायालयने परवानगी दिल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ईव्हीएमवर होणाऱ्या टीकेवर बोलताना फडणवीस म्हणाले की, ईव्हीएमवर बोलण्यापेक्षा त्यांना आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. एकाच दिवशी झारखंड आणि महाराष्ट्रात निवडणूक होते. ते झारखंडमध्ये जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगले असल्याचे म्हटले जाते. परंतु महाराष्ट्रात पराभव झाला तर  ईव्हीएमचा घोळ असल्याचे म्हटले जाते.

पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला.
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार.
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही.
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले...
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले....
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी.
'तिकडे सगळंच हायजॅक झालंय', सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंवर पलटवार
'तिकडे सगळंच हायजॅक झालंय', सुरेश धस यांचा पंकजा मुंडेंवर पलटवार.