AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोळीबाराच्या घटनांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान परिषदेत महत्त्वाचं उत्तर

महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण आणि अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणावर नेमका काय तपास झाला, तसेच याबाबतच्या आरोपांवर आज विधान परिषदेत भूमिका मांडली.

गोळीबाराच्या घटनांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान परिषदेत महत्त्वाचं उत्तर
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 01, 2024 | 7:26 PM
Share

विनायक डावरुंग, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 1 मार्च 2024 : महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी लोकप्रतिधींशी संबंधित दोन गोळीबाराच्या घटना समोर आल्या. पहिली घटना ही कल्याणमध्ये घडली. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुखावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला. तर दुसरी घटना ही दहिसरला घडली. शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांच्यावर हल्ला करणारा आरोपी मॉरीसने देखील स्वत:ला गोळ्या झाडत संपवलं. या दोन घटनांवरुन सत्ताधारी शिंदे सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांकडून निशाणा साधला जात होता. विरोधी पक्षांकडून या घटनांवरुन देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीदेखील मागणी करण्यात आली. या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत भूमिका मांडली.

“गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण चर्चेला आलं. हा वाद जमिनीच्या वादातून झाला आहे. अभिषेक घोसाळकर यांची घटना देखील गंभीर आहे. या घटनांना इतर देखील अँगल आहेत. घोसाळकर यांची हत्या दुर्दैवी आहे. ही हत्या वैयक्ती वादातून झाली आहे. फेसबुक लाईक करताना ही हत्या करण्यात आली आहे. या घटनेतील आरोपीचा अंगरक्षक अमरिंदर कुमार याला अटक केली आहे. त्याची पिस्तुल लायसन्स असणारी होती”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात दिली.

पत्रकार निखिल वागळे यांच्या हल्ल्यावर फडणवीसांची भूमिका

“देशाचे पंतप्रधानांबाबत चुकीचं बोलणं योग्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्यात आलेला नाही. निखिल वागळे यांना पोलिसांनी आधीच सांगितल होतं की आम्ही पुण्यातील रस्ता क्लिअर करतो मग तुम्ही जा. मात्र निखिल वागळे यांनी ऐकलं नाही. त्यांना वाचवण्यासाठी साध्या ड्रेसमधील लोक देखील होते”, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली.

‘मला सगळ्यांपासून धोका वाटू लागलाय’

“जळगाव जिल्ह्यात कोणापासून कोणाला धोका आहे, हे मला माहिती नाही. पण मला सगळ्यांपासून धोका वाटू लागला आहे”, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन यांना टोला लगावला.

‘महाराष्ट्रात 1 लाख कोटींची गुंतवणूक आली’

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत इतर मुद्द्यांबाबतही सविस्तर माहिती दिली. “महाराष्ट्रात 1 लाख कोटींची गुंतवणूक आली आहे. एफडीआयमध्ये महाराष्ट्राने पहिला नंबर पटकवला आहे. शेतकऱ्याला 12 तास वीज उपलब्ध होईल अशी व्यवस्था आपण करत आहोत. यासाठी एक मॉडेल तयार केलं आहे. आपण आता शेतकऱ्याला वीज देताना ती 7 रुपये प्रति युनिट खर्च येतो. या मॉडेलमुळे खर्च कमी होईल. मोदी यांनी प्रधानमंत्री सोलार योजना आणली आहे. त्यामुळे 300 युनिट प्रमाणे वीज मोफत मिळणार आहे”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

‘पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र नार्कोटिक्स सेल उभं केलं जाईल’

“ड्रग्जबाबतीत झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे. जर एखादा पोलीस गुंतला असेल तर त्यालाही तात्काळ बडतर्फ केले जाईल. केमिकल कारखान्यातील मशिनचा वापर करून एमडी बनवलं जातंय. यासाठी बंद आणि सुरू असलेल्या केमिकल कारखानांची चौकशीची मोहिम राबवली जाईल. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र नार्कोटिक्स सेल उभं केलं जाईल”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Follow Us
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर