AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेसाठी रस्त्यावर उतरणं योग्य नाही; गृहमंत्र्यांचा भाजपला टोला

पालघर साधू हत्याकांडाला एक वर्षे पूर्ण झालं असून साधूंच्या मारेकऱ्यांना अजूनही शिक्षा झालेली नाही. (dilip walse patil slams bjp over palghar sadhu case)

वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेसाठी रस्त्यावर उतरणं योग्य नाही; गृहमंत्र्यांचा भाजपला टोला
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
| Updated on: Apr 16, 2021 | 1:02 PM
Share

मुंबई: पालघर साधू हत्याकांडाला एक वर्षे पूर्ण झालं असून साधूंच्या मारेकऱ्यांना अजूनही शिक्षा झालेली नाही. त्याचा निषेध म्हणून आज भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यावरून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. कोरोनाचं संकट वाढत आहे. अशावेळी वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेसाठी रस्त्यावर उतरणं योग्य नाही, असा टोला दिलीप वळसे-पाटील यांनी लगावला आहे. (dilip walse patil slams bjp over palghar sadhu case)

प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीप वळसे-पाटील यांनी ही टीका केली. प्रत्येक नेत्याने जबाबदारीने वागलं पाहिजे. आज कोरोनाचा एवढा मोठा संसर्ग असताना वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेसाठी रस्त्यावर उतरून प्रदर्शन करणं योग्य नाही. जी घटना घडली तिचा तपास होत राहिल. दोषींना शिक्षा होईल, असं वळसे-पाटील यांनी सांगितलं. विरोधकांनी कोरोना नियमांचं पालन करावं, कोरोना वाढीला मदत करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

पोलिसांवरील ताण वाढला

सरकारने यावेळी घातलेल्या निर्बंधामधून अत्यावश्यक सेवांना सूट दिली आहे. त्यामुळे लोक रस्त्यावर येत असून पोलिसांवरील ताण वाढला आहे. मागच्या लॉकडाऊनमध्ये सर्व बंद होतं. त्यामुळे रस्ते निर्मनुष्य होते. त्यामुळे नागरिकांनी आता घराबाहेर पडू नये. काम असेल तरच घराबाहेर पडा. ही हात जोडून विनंती आहे. आपल्या घरातच राहा आणि सहकार्य करा, असं आवाहन त्यांनी केलं.

नागरिकांना अडवण्यासाठी निर्बंध नाही

महाराष्ट्राची आणि देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. केवळ नागरिकांना आडवायचं म्हणून निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. तर कोरोनाची चेन ब्रेक करायची आहे. ही चेन ब्रेक करायची असेल तर त्यासाठी आपल्याला घरात राहिलं पाहिजे. लोकसंपर्क टाळला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्याचे प्रयत्न सुरू

आज हॉस्पिटलमध्ये भीषण परिस्थिती आहे. बेड मिळत नाहीत. ऑक्सिन नाही, रेमडेसिवीरही नाही. या सर्व अडचणी प्रशासनासमोर आहेत. रेमडेसिवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी एफडीए आणि पोलीस एकत्र कारवाई करत आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. (dilip walse patil slams bjp over palghar sadhu case)

संबंधित बातम्या:

ऐन कोरोना काळात गूड न्यूज! यावर्षी चांंगला पाऊसकाळ, सामान्य मॉन्सूनचा हवामान विभागाचा पहिला अंदाज

Corona Cases and Lockdown News LIVE : ससून रुग्णालयात कोरोना रुग्णांची हेळसांड, एका बेडवर 2-3 रुग्णांवर उपचार सुरु

कौटुंबिक आत्महत्यांचं वाढतं सत्र, चिमुकल्याला दोरीला बांधून कोल्हापुरात दाम्पत्याची नदीत उडी

(dilip walse patil slams bjp over palghar sadhu case)

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.