AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BREAKING : शिंदे सरकार मविआच्या दोन नेत्यांवर मेहरबान, इतरांची थेट सुरक्षा काढली

एकीकडे शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची सुरक्षा काढली असली तरी दोन नेत्यांची सुरक्षा काढण्यात आलेली नाही.

BREAKING : शिंदे सरकार मविआच्या दोन नेत्यांवर मेहरबान, इतरांची थेट सुरक्षा काढली
Image Credit source: tv9 marathi
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 28, 2022 | 9:15 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन तीन महिने झाले आहेत. सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार शिंदे सरकारवर निशाणा साधला जातोय. काही दिवसांपूर्वी वेदांता फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली होती. त्यानंतर आता नागपूरमधील प्रस्तावित टाटा एअरबस प्रकल्पदेखील गुजरातला स्थलांतरीत करण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जातोय. या सगळ्या घडामोडींदरम्यान शिंदे सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची सुरक्षा काढली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

शिंदे सरकारने महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत, बंटी उर्फ सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, नवाब मलिक, भास्कर जाधव, नरहरी झिरवळ, सुनील केदारे आणि डेलकर परिवार यांची सुरक्षा काढली आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावेळी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. पण आता शिंदे सरकारने वरुण सरदेसाई यांची देखील सुरक्षा काढली आहे. तसेच राज्य सरकारने विरोधी पक्षनेते अजित पवार यांचीदेखील सुरक्षा कमी केली आहे. या माध्यमातून शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या नेत्यांना हा झटका दिल्याचं मानलं जात आहे.

एकीकडे शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची सुरक्षा काढली असली तरी दोन नेत्यांची सुरक्षा काढण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे शिंदे सरकारने शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्यांना आधी x प्लस दर्जाची सुरक्षा होती. पण आता त्यांना y प्लस दर्जाची सुरक्षा आणि एक्सकॉर्ट देण्यात आलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा जैसे थे ठेवण्यात आली आहे.

शिंदे सरकारने महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची सुरक्षा काढली असली तरी मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील जवळीक वाढली आहे. मिलिंद नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना पक्षाचे सचिव. त्यांना एकनाथ शिंदेंनी आपल्या गटात वळवलं तर राज्याच्या राजकारणात आणखी वेगळं समीकरण बघायला मिळू शकतं. शिंदे गटाला कदाचित त्याचा फायदाच होऊ शकतो.

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड