AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत जवळपास 6.3 लाख शेतकऱ्यांना 5,080 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. तांत्रिक अडचणी आणि केवायसीमुळे लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही यावेळी दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज... प्रतिक्षा संपली... कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
maharashtra farmerImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 24, 2026 | 1:07 PM
Share

अक्षय मंकनी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : कर्जमाफीच्या तिसऱ्या यादीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्याच जाहीर होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे यादीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांवरचा मोठा भार कमी होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना ही यादी आल्यानंतर पुढच्या कामालाही लागता येणार आहे. त्यामुळे आज किंवा उद्या ही यादी जाहीर झाल्यावर बळीराजाला आपलं नाव चेक करता येणार आहे.

कर्जमाफीची तिसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. तिसऱ्या यादीत तब्बल 6 लाख 30 हजारांच्या आसपास लाभार्थी आहेत. या शेतकऱ्यांसाठी एकूण 5 हजार 80 कोटी रुपये वितरित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील दोन याद्यांमध्ये तांत्रिक अडचणीमुळे लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील पैसे वितरित होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. केवायसीमुळे कर्जमाफीचा लाभ न मिळू शकलेल्या जवळपास 1 लाख शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.

हिंगोलीत किती पात्र?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 43 हजार 525 शेतकरी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. या पात्र शेतकऱ्यांपैकी 33 हजार 926 लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहेत.

वचन पूर्ण केलं

दरम्यान, गेल्या आठवड्यात शेतकरी कर्जमाफीबद्दलची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली होती. यावर्षी राज्यातील 53 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं वचन दिलं होतं. 36 हजार कोटी रुपयाचा कर्ज माफ करून शेतकऱ्यांना दिलास देण्याचा काम सरकारने केलं आहे. निवडून आल्यावर वचन दिला होतं. 45 हजार शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा वीज माफ केली. आणि पुढील पाच वर्ष वीज बिल येणार नाही असं काम सरकारने केलंय, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते.

जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतात वीज आणि पाणी नसेल तोपर्यंत महाराष्ट्र विकसित होऊ शकत नाही. हे मी मानणारा आहे. या गोष्टी शेतकऱ्यांना मिळाल्या तर शेतकऱ्यांचा मुलगा चपऱ्याश्याची नोकरी मागण्यासाठी जाणार नाही. शेतात काम करणाऱ्या मजूर बहिणीला मजबूत करायचं आहे. महाराष्ट्र सरकारमधून त्यांना जमीन देऊन आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं.

Follow Us
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त...पंतप्रधान मोदींचं नाव घेत नेता...
मी राजकारणदेखील सोडायला तयार, फक्त... पंतप्रधान मोदींचं नाव घेत बड्या नेत्याचं खुलं चॅलेंज!
मोठी बातमी! पंजाब, UP सह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या...
मोठी बातमी! पंजाब, उत्तर प्रदेशसह 7 राज्यांमधील निवडणुकीसाठी भाजपच्या हालचाली वाढल्या, दिल्लीत...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या...
खासगी कोचिंग क्लासेससाठी सरकारचे नवे कडक नियम? महाराष्ट्र्शासन मोठ्या तयारीत
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले...
अमरावती जिल्हा रुग्णालयाला भीषण आग: व्हेंटिलेटर स्फोटात तीन चिमुकले दगावले, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल
Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : मुलांसाठी मैदानं ठेवताय कुठे? आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट सवाल