सुरमई 800, तर कोळंबी 500 रुपये किलो, चक्रीवादळामुळे मासे महागले

मुंबईसह उपनगरात माशांच्या आवक घटली असून माशांच्या किंमतीतही 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे मुंबईमध्ये मासे खाणाऱ्या खवय्यांच्या तोंडचे पाणी पळाले (Fish Rate increase in market) आहे.

सुरमई 800, तर कोळंबी 500 रुपये किलो, चक्रीवादळामुळे मासे महागले
Follow us
| Updated on: Nov 10, 2019 | 4:51 PM

ठाणे : अरबी समुद्रात सातत्याने निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे मासेमारीवर बंदी घालण्यात आली (Fish Rate increase in market) आहे. त्यामुळे कुलाबा, पालघर, डहाणू, वसई यासारख्या भागांमध्ये समुद्रात मासेमारीवर बंदी घाल्याने याचा तुटवडा जाणवू लागला आहे. विशेष म्हणजे मुंबईसह उपनगरात माशांच्या आवक घटली असून माशांच्या किंमतीतही 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे मुंबईमध्ये मासे खाणाऱ्या खवय्यांच्या तोंडचे पाणी पळाले (Fish Rate increase in market) आहे.

मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण किनारपट्टीवर ऑगस्ट महिन्यापासून मासेमारीचा हंगाम सुरु होतो. त्यानतंर ऑक्टोबरपासून चांगल्या प्रकारचे मासे मिळायला सुरुवात होते. मात्र क्यार, महा या दोन्ही अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा फटका मासे उत्पादनाला बसला आहे. मुंबईतील कुलाबा आणि भाऊच्या धक्का या दोन ठिकाणाहून मुंबई उपनगर, ठाणे या ठिकाणी माशांची आवक होते.

मात्र गेल्या काही दिवसांपासून मासेमारी बंद असल्याचे माशांच्या पुरवठ्यात घट झाली आहे. त्यामुळे माशांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. हिवाळ्यात माशांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. सद्य: स्थितीत बाजारात माशांची आवक होत नसल्याने त्याच्या किमतीत वाढ झाल्याचे मासळी विक्रेत्यांनी सांगितले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आसपासच्या परिसरात माशांची आवक घटल्याने माशांच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर पुरवठ्यात 60 ते 70 टक्क्यांनी घट झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणं (Fish Rate increase in market) आहे.

ऑक्टोबर महिन्यात जवळपास 150 रुपये किलो या दराने मिळणारे बोंबिल सध्या 200 रुपये किलोने मिळत आहेत. तर 400 रुपये किलोने मिळणारी कोळंबी सध्या 500 रुपये किलोने मिळत आहे. पापलेटच्या किमतीतही वाढ झाली असून पापलेट आकारानुसार 600 ते 1200 रुपये किलोने मिळत होते. मात्र आता 800 ते 1500 रुपये किलोने मिळत आहेत. तसेच 550 रुपये किलोने मिळणारी सुरमई सध्या 800 रुपये किलोने मिळत आहेत.

त्यामुळे माशांच्या किमतीत प्रति किलोमागे 100 ते 300 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे मासे खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. गेल्या काही काळात जिताडा माशालाही खवय्यांकडून मोठी मागणी असते. उत्तम प्रतीच्या जिताडय़ाचे दरही किलोमागे 1 हजार ते 1200 रुपयांपर्यत पोहोचले आहेत.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.