AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माहीम बीचवर पाच कॉलेज तरुण बुडाले, तीन जणांना वाचविण्यात यश, दोघांचा मृत्यू

होळी आणि धुळवडीचा आनंद साजरा करण्यासाठी माहीमच्या समुद्रात उतरलेले चार कॉलेज तरुण पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली यातील चौघांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र एका तरुणाला शोधण्यात अद्याप यश आलेले नाही.

माहीम बीचवर पाच कॉलेज तरुण बुडाले, तीन जणांना वाचविण्यात यश, दोघांचा मृत्यू
mumbai seaImage Credit source: TV9MARATHI
| Edited By: | Updated on: Mar 25, 2024 | 9:48 PM
Share

माहीम : होळी आणि रंगपंचमीचा सण सर्वत्र साजरा होत असताना माहीम बीचवर पाच कॉलेजचे तरुण पाण्यात बुडाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने यातील चौघा तरुणांना पाण्याबाहेर काढले. त्यातील तीन तरुणांना जीवनदान मिळाले तर दोन तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या  एका अन्य घटनेत दहीसर येथील हनुमान टेकडी परिसरात खदाणीत पोहायला गेलेल्या दोघा जणांचा मृत्यू झाला आहे.

होळी आणि धुळवडीच्या आनंदाला मुंबईत गालबोट लागले आहे. दादर जवळील माहीम बीचवर समुद्राच्या पाण्यात खेळायला उतरलेले कॉलेजचे तरुण दुपारी चारच्या सुमारास पाण्यात उतरले. वडापाव खाल्यानंतर या तरुणांनी समुद्राच्या पाण्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला. परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने या चार तरुण गंटागंळ्या खाऊ लागले. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तरुणांपैकी चौघांना पाण्याबाहेर काढले. त्यातील दोघांना डॉक्टरांनी तपासून घरी सोडले. तर दोघांवर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ओम लोट ( 16 ) हा दहावीचा विद्यार्थी आयसीयुत आहे, तर हर्ष किंजले ( 19 ) या 14 वीच्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर यश कागडा ( 16 ) हा अकरावीचा विद्यार्थी मिसिंग असून त्याचा शोध सुरु आहे. दुपारी साडे तीन वाजता वडापाव खायाला येथे आले होते. त्यानंतर ते समुद्रात मौजमस्ती करायला उतरल्यानंतर काही वेळातच लाटांचा अंदाज न आल्याने ते बुडाले. परंतू अग्निशमन दलामुळे पाच तरुणांपैकी तीन जणांना वाचविण्यात यश आले. एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक जण बेपत्ता आहे. यश कागडा नावाचा तरुण अद्यापही बेपत्ता आहे. त्याला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र यश मिळालेले नाही. अंधार पडल्याने आता शोध मोहीम बंद करण्यात आली आहे. मात्र उद्या सकाळी पुन्हा शोध मोहीम शुरू करण्यात येणार आहे. कोणताही सण साजरा करताना अतिउत्साह दाखवू नये जीवाची काळजी घ्यावी असे आवाहन माहीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिलाल शेख यांनी केले आहे.

दहीसरमध्ये दोघांचा मृत्यू

दहीसर येथील सुरज पटेल मार्ग, हनुमान टेकडी, अशोक वन परिसरातील जय महाराष्ट्र खदानीत दुपारी दोन जण पाण्यात उतरले होते. मनोज रामचंद्र सुर्वे ( 45 ) तसेच चिंतामणी वारंग ( 43 ) अशा दोघांना शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषीत केले आहे.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा