AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धीर देणारं, पण सतर्क करणारं, आश्वासक पण इशारा देणारं, राजेश टोपे यांचं पत्र

आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope letter) यांनी राज्यातील जनतेला कोरोनाविषयी खबरदारी घेण्याबाबत पत्र लिहिलं आहे.

धीर देणारं, पण सतर्क करणारं, आश्वासक पण इशारा देणारं, राजेश टोपे यांचं पत्र
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
| Updated on: Feb 22, 2021 | 3:43 PM
Share

मुंबई: आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राज्यातील जनतेला कोरोनाविषयी खबरदारी घेण्याबाबत पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे त्यांनी राज्यातील जनेतला धीर देणारं, पण सतर्क करणारं, आश्वासक पण इशारा देणारं पत्र लिहिलं आहे. (Health Minister Rajesh Tope wrote letter to people to Maharashtra over Corona )

आपल्याला सामूहिक लढाई लढायचीय…

गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना व प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्व न करता लढणारे अनेक कोरोना योद्धे, डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करु शकलो. मात्र, अद्यापही कोरोना गेलेला नाही. तो पुन्हा डोके वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदका सामूहिक लढाई लागणार आहे, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलेय.

राजेश टोपेंचे पत्र

मी हॉस्पिटलमध्ये कोरोनाविरुद्ध लढतोय..

राजेश टोपे पत्रात पुढे लिहितात, मी सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाविरुद्ध लढतो आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणू माझा पाठलाग करत होता. राज्यातील अनेक भागात गेलो. कोरनोा हॉटस्पॉटला भेटी दिल्या. परंतु, कोरोनाला माझ्या जवळ येणे जमले नाही. पण अखेर त्यांने गाठलेच. राज्यातील जनतेच्या सदभावना, प्रेम यामुळे त्याला हवून मी पुन्हा एकदा कोरोना विरुद्धच्या सामूहिक लढाईत सहभागी होणार आहे, असं टोपे म्हणाले.

समजदार,सवेंदनशील व सहकार्य करणारे लोक…

आरोग्यमंत्र्यांनी पत्रात पुढे, समजदार, संवेदनशील व सहकार्य करारे लोक ही आपल्या राज्याची ओळख आहे. म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा सामना अत्यंत संयमाने केल्याचं आपण पाहिले. मात्र, आता पुन्हा लॉकडाऊन परवडणारे नाही. लॉकडाऊन टळणं केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. मास्क सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर, तंतोतंत पाळा व लॉकडाऊन टाळा, असं आवाहन राजेश टोपेंनी केले आहे. एकजुटीनं, एकमतानं, एकनिर्धारानं कोरोनाला हरवुया, असं आवाहन राजेश टोपेंनी केले आहे.

राजेश टोपे यांना कोरोना संसर्ग

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी 18 फेब्रुवारीला ट्विटरवरुन कोरोना झाल्याची माहिती दिली. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी”, असं राजेश टोपे ट्विटरवर म्हणाले आहेत

संबंधित बातम्या 

खडसे कुटुंबात कोरोनाचा शिरकाव, रक्षा खडसे पॉझिटिव्ह, एकनाथ खडसेंना तिसऱ्यांदा कोरोनाची लागण?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

(Health Minister Rajesh Tope wrote letter to people to Maharashtra over Corona )

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.