AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार दिवसांच्या ब्रेक नंतर पुन्हा धुमशान, मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस; चाकरमान्यांची त्रेधातिरपीट

गेल्या चार दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने आज पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

चार दिवसांच्या ब्रेक नंतर पुन्हा धुमशान, मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस; चाकरमान्यांची त्रेधातिरपीट
mumbai rain Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 14, 2023 | 8:47 AM
Share

मुंबई : तब्बल चार दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज पहाटेपासूनच मुंबईसह ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून मुंबई, ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाने सकाळपासूनच जोर धरल्याने संपूर्ण दाणादाण उडाली आहे. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तर त्रेधातिरपीट उडाली आहे. सुदैवाने अजूनही कुठेच पाणी तुंबल्याच्या तक्रारी आलेल्या नाहीत. पावसामुळे रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. तसेच कुठेही वाहतूक कोंडी झालेली नाही.

मुंबई आणि उपनगरांत पहाटेपासूनच पावसाने जोरदार हजेरीस लावली. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी आणि बदलापूरमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, मालाडसह मुंबई उपनगरातील सर्व भागात आता पाऊस पडत आहे. अंधेरी सबवेच्या जवळ मुसळधार पाऊस सुरु असून भुयारी मार्गात पाणी भरू लागले आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास मिलन सबवेमध्ये पाणी भरण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतील इतर सखल भागातही पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चाकरमान्यांची त्रेधातिरपीट

दरम्यान, पहाटे पासूनच पावसाने धुमाकूळ घातल्याने चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडताना छत्री आणि रेनकोट घेऊनच बाहेर पडावे लागले. पाऊस आणि वारा यामुळे रस्त्यावरून चालताना अनेकांना भिजावं लागलं. तसेच मुसळधार पावसामुळे रिक्षाही वेळेत मिळत नसल्याने अनेकांना स्टेशनपर्यंत पायीच चालत जावं लागल्याने चांगलीच दमछाक झाली.

नवी मुंबईला झोडपले

नवीमुंबईतही सकाळपासूनच पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. नवी मुंबईतील, सानपाडा, सीवूड दाराव्हे, खारघर, बेलापूर आणि खांदेश्वर या भागात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. नवी मुंबईसह पनवेल आणि रायगडमध्येही पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वसई, विरारमध्येही पावसाचा जोर

वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस सुरू आहे. आज सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरूवात झाली आहे. दोन दिवसांच्या उघडीप नंतर आज पुन्हा पाऊस सुरू झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात भात पेरणीला सुरूवात झाली आहे. वसई आणि विरार शहरात कुठेही पाणी साचले नसून सर्व वाहतूक सुरळीत सुरू आहे.

पाच दिवस पावसाचेच

दरम्यान, हवामान खात्यानेही आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच राज्यात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. तर मराठवाड्यासह इतर भागातही मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

Follow Us
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण