AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ दोन हजार कोटींच्या डीलची आधीच माहिती होती; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

भाजपने सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यावरही संजय राऊत यांनी टीका केली. पुन्हा सत्तेत येऊन दाखवावे. आमच्या त्यांना शुभेच्छा..., असा सूचक इशाराच राऊत यांनी दिला.

'त्या' दोन हजार कोटींच्या डीलची आधीच माहिती होती; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 20, 2023 | 10:53 AM
Share

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप, शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह विकत घेण्यासाठी दोन हजार कोटींचा सौा झाल्याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच आमची लढाई ही मिंधे गटासोबत नाही. आमची लढाई ही देशाला हुकूमशाहीकडे नेणाऱ्या भाजपविरोधात आहे. मिंधे गटाची आमच्याविरोधात लढण्याची पात्रता नाही, असं संजय राऊत यांनी ठणकावलं आहे. तसेच न्याय विकत घेण्यासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाल्याची आपल्याला आधीच माहिती होती, असा दावाही राऊत यांनी केला.

या सत्ताधारी पक्षाच्या गुलाम झाल्या आहेत. बनवलं असलं तरी आम्ही लोकांना दाखवत आहोत. देशाला दाखवत आहोत. सत्य आणि न्यायाची बाजू कशी डावलली जात आहे. मी काल स्पष्ट सांगितलं. चिन्ह आणि पक्षाचं नाव यासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाला. व्यवहार झाला. कालही सागितलं, आजही सांगितलं, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

प्रचंड पैशाचा वापर

निकाल लागण्याची प्रक्रिया सुरू होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस स्वत: सांगत होते निकाल आपल्याच बाजूने लागेल. मिंधे गटाचे नेते म्हणत होते निकाल आमच्याच बाजूने लागेल. एक केंद्रीय मंत्री सांगत होते, आम्हीच. निकाल फिरवण्यासाठी दोन हजार कोटींचा सौदा झाला याची मला तेव्हाच माहिती होती. न्याय आणि निर्णय यात फरक आहे. प्रचंड पैशाचा वापर करून निर्णय विकत घेतला आहे, असा आरोप त्यांनी केला.

पुरावे देईन

लवकरच पुरावे देईन. कोण विरोधक. आम्ही भाजपचे विरोधक आहोत. आमची लढाई मिंधे गटाशी नसून देश हुकूमशाहीकडे नेणाऱ्या भाजपशी आहे. मिंधे गट गुलाम आहे. त्यांची लढण्याची पात्रता नाही. पैसा मिंध्यांचा आणि यंत्रणा त्यांची त्यामुळे न्याया विकत घेतला आहे, अशी टीका त्यांनी केली.

सत्तेत येऊन दाखवा

भाजपने सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यावरही संजय राऊत यांनी टीका केली. पुन्हा सत्तेत येऊन दाखवावे. आमच्या त्यांना शुभेच्छा…, असा सूचक इशाराच राऊत यांनी दिला.

शिवसेना अंगार आहे

शिवसेना महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. शिवसेना तोडून तुम्ही ज्या प्रकारे विकट हास्य करत आहात. एकेकाळी आम्ही काँग्रेसविरोधात लढलो होतो. आज कोणी काँग्रेसवाला बनत असेल मुखवटा घालून तर आम्ही लढणार. शिवसेना संपणार नाही. ही आग आहे. ती विझणार नाही. हा अंगार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

व्यापाऱ्यांना मुंबई खरेदी करायचीय

अमित शाह हे मराठी माणसांचे शत्रू आहेत ही महाराष्ट्राच्या जनतेची भावना आहे. 2014 सालच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी याच भावना व्यक्त केली होती. भाजपला मुंबई विकत घ्यायची आहे. शिवसेना सर्वात मोठा अडथळा आहे. काही व्यापाऱ्यांना मुंबई खरेदी करायची आहे. आम्ही होऊ देणार नाही. त्यामुळे सर्व हातखंडे वापरले जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.