AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा अध्यक्षांच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे, सोप्या भाषेत समजून घ्या राष्ट्रवादीचा निकाल

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केला आहे. या निकालात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण अजित पवार यांच्या गटला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे, सोप्या भाषेत समजून घ्या राष्ट्रवादीचा निकाल
| Updated on: Feb 15, 2024 | 6:21 PM
Share

मुंबई | 15 फेब्रुवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल जाहीर केला. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल देताना आधी पक्ष कुणाचा आहे, याबाबत निकाल दिला. पक्षाची घटना, रचना आणि संख्याबळ या त्रिसूत्रीच्या आधारावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा याबाबत निकाल दिला. विधानसभा अध्यक्षांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. तसेच त्यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गटातील हा वाद आहे. ही पक्षातील फूट नाही. दोन्ही गटांनी पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे दहाव्या परिशिष्टानुसार कारवाई करता येणार नाही, असं विधानसभा अध्यक्षांनी नमूद केलं.

विधानसभा अध्यक्षांच्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे

  • अजित पवार गट हा मूळ राष्ट्रवादी पक्ष असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे.
  • अजित पवार गट आणि शरद पवार गट अशा दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरविण्यात आलं आहे.
  • अजित पवार गटाच्या 1, 3, 4 नंबरच्या याचिका फेटाळण्यात आल्या आणि शरद पवार गटाच्या आमदारांना पात्र ठरविण्यात आलं आहे.
  • कुणीही अपात्र नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.
  • विधीमंडळातील बहुमत पाहता मूळ राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार गटाचा आहे, असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला.
  • दहावीच्या सूचीचा वापर हा पक्षातील बेशिस्तपणासाठी वापरता येणार नाही, असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले.
  • दहावी सूचीचा वापर पक्षातील बहुमताला धमकावण्यासाठीदेखील करता येणार नाही, असंही विधानसभा अध्यक्ष म्हणाले आहेत.
  • पक्षामध्ये कोणतीही फूट पडलेली नाही तर गट तयार झाला होता, असं विधानसभा अध्यक्ष निकाल वाचताना म्हणाले.
  • पक्षीय रचना, घटना आणि विधीमंडळ बळ या त्रिसूत्रीवर आपला हा निकाल असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी निकाल वाचताना स्पष्ट केलं.
  • पक्षातील नाराजी म्हणजे विधीमंडळ पक्षातील नाराजी नाही. तसेच पक्षातील मतभेद म्हणजे कायद्याचा भंग असं म्हणता येणार नसल्याचं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे.
  • शरद पवारांच्या मनाविरोधात जाणं म्हणजे पक्ष सोडणं नाही, असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले.
  • कुणीही पक्ष सोडलेला नाही. दोन गट पडले आहेत. या दोन गटातील हा पक्षांतर्गत वाद आहे. कुणीही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे दहाव्या सुचीनुसार कारवाई करता येणार नाही, असं विधानसभा अध्यक्ष म्हणाले.
  • शरद पवार गटाच्या सर्व याचिका फेटाळत अजित पवार गटाचे आमदार पात्र आहेत, असा निर्वाळा विधानसभा अध्यक्षांनी दिला.
  • अजित पवार यांच्या गटाकडे 41 आमदार आणि 2 खासदार आहेत. तर शरद पवार गटाकडे 14 आमदार आणि 4 खासदार आहेत. यापैकी कुणीही अपात्र नाहीत, असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.