आयपीएलसाठी स्टेडियमध्ये 59 टक्के क्षमतेची प्रेक्षकांना परवानगी द्या; कोळीवाडे गावठाणांचे सीमांकन करा; आमदार आशिष शेलार यांची मागणी

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Mar 21, 2022 | 6:55 PM

आमदार ॲड. आशिष शेलार यांनी मुंबईत होणाऱ्या आयपीएल सामन्यांबाबतच्या एका मुद्याकडे लक्ष वेधले. या सामान्यांसाठी स्टेडियमध्ये २५ टक्के क्षमतेने प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. स्टेडियमची क्षमता पाहता तसेच त्यातील काही जागा शासनाला द्याव्या लागत असल्याने सर्वसामान्य प्रेक्षकांना अत्यअल्प जागा उपलब्ध होणार आहेत.

आयपीएलसाठी स्टेडियमध्ये 59 टक्के क्षमतेची प्रेक्षकांना परवानगी द्या; कोळीवाडे गावठाणांचे सीमांकन करा; आमदार आशिष शेलार यांची मागणी
Ashish Shelar
Image Credit source: TV9

Follow us on

मुंबईः आयपीएलसाठी (IPL) वानखेडे, ब्रेबॉन, डीवाय पाटील या स्टेडियममध्ये (Stadium) 25 टक्के ऐवजी 50 टक्के क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश देण्याची परवागी देण्यात यावी अशी मागणी भाजपा आमदार ॲड. आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली. विधानसभेत आज मत्सव्यवसाय, क्रिडा, सार्वजनिक बांधकाम आणि सहकार विभागावर चर्चा करीत असताना आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबईतील गावठाण, कोळवाड्यातील प्रश्न अग्रक्रमाने मांडले. तसेच याचवेळी त्यांनी मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका, मुंबईतील खेळाच्या मैदानांची लीज हे विविध विषयांकडे सरकारचे लक्ष वेधले.

क्रिडा विभागावर बोलातना आमदार ॲड. आशिष शेलार यांनी मुंबईत होणाऱ्या आयपीएल सामन्यांबाबतच्या एका मुद्याकडे लक्ष वेधले. या सामान्यांसाठी स्टेडियमध्ये 25 टक्के क्षमतेने प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे. स्टेडियमची क्षमता पाहता तसेच त्यातील काही जागा शासनाला द्याव्या लागत असल्याने सर्वसामान्य प्रेक्षकांना अत्यअल्प जागा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे एमसीएतर्फे याबबात क्षमता वाढवून देण्याची मागणी करण्यात येत आहे. शासनाने २५ टक्के ऐवजी 50 टक्के क्षमतेची परवानगी देण्याबाबत विचार करावा, अशी मागणी आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केली.
तसेच मुंबईतील ओव्हल मैदान, आझाद मैदान या मैदानावर नव खेळाडू तयार करण्यात येतात पण या मैदानांतील खेळपट्टयांची लिज संपली असून शासनाने हे लिजचे तातडीने नूतनीकरण करावे अशी मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली. यावेळी मुंबईतील गावठाण, कोळीवाडयांच्या महत्वाच्या विषयांकडे लक्ष वेधताना आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील सायन, कुलाबा, धारावी, प्रिंसेस डॉक, वरळी, शिवडी, माहिमसह 8 कोळीवाडयांचे सीमांकन करण्याचे काम रखडले असून याबाबत महापालिकेने महसूल विभागाचे अभिप्राय नसल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यात भाजपा सरकार असताना हे काम सुरू झाले होते मात्र सध्या या कारणास्तव हे काम बंद असून जो पर्यंत सिमांकन होत नाही तोपर्यंत या मुळ मुंबईकरांच्या घरांचा पुर्नविकास होऊ शकणार नाही. त्यामुळे मुंबईतील सर्व गावठाण, कोळीवाडयांचे सिमांकन तातडीने करण्याची मागणी आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केली.

खार दांडा कोळीवाडयातील मासे सुकवण्यासाठी वापरात असलेल्या मोकळ्या जागेवर शासनातर्फे जसानी रिॲलिटी तर्फे एसआरए योजना राबविण्यात येत असून ही जागा कोळी बांधवांसाठी राखीव ठेवण्यात यावी तसेच याच कोळीवाड्यामध्ये जूहू कोळवाडा येथे पंपिंग स्टेशन उभारताना बाजूला मोकळी जागा शिल्लक असून ही जागा कोळी बांधवांसाठी मासे सुकवण्यासाठी, बोटी नांगरण्यासाठी, बोटी दुरूस्तीसासाठी, जाळी विणण्यासाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार शेलार यांनी यावेळी केली. वरळीच्या कोळीवाड्यातील बांधव गेले अनेक दिवस कोस्टल रोडच्या दोन खांबातील अंतर 160 मिटर असावे म्हणून आंदोलन करीत आहेत. जर हे अंतर 160 मिटर नसेल त्यांना त्यांच्या बोटी समुद्रात घेऊन येजा करणे शक्य होणार नाही. त्यांचा मासेमारीचा व्यवसाय धोक्यात येईल. महापालिकेने जो अहवाल सादर केला त्यामध्ये जे नमुद केले आहे, त्यानुसार ही मागणी कोळी बांधव करीत असून शासनाने यांच्या मागणीकडे लक्ष दिलेले नाही त्यामुळे याबाबत तातडीने लक्ष देण्यात यावे अशी मागणी आमदार शेलार यांनी यावेळी केली.

मुंबईतील 50 हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका घेण्यासाठी शासनाने जो नविन उपविधी जाहीर केला आहे तो जाचक तर आहेच शिवाय तो वेळ आणि पैशाचा अपव्यय करणारा आहे. त्यामुळे गृहनिर्माण सोसायटयांमध्ये असंतोष असून त्यांच्या निवडणुका जुन्याच पद्धतीने घेण्यात याव्यात. मुंबईतील मान्यता प्राप्त अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अद्याप लागू करण्यात आलेला नाही तो लागू करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

संबंधित बातम्या

शेअर मार्केटमध्ये घसरणीचं सत्र, सेन्सेक्स 550 अंकांनी घसरला; पेटीएम डाउन!

शंकरपाळ्या आणि कारल्यानंतर आता राज्यभर गाजतंय ‘या’ दोघांचं भांडण, Beedमधला Video viral

Lucknow Super Giants IPL 2022: ‘त्या’ बांग्लादेशी गोलंदाजामुळे धोनीचा अपमान झाला होता, आता गौतम गंभीर त्यालाच संधी देणार

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI