AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुखपत्रातून काहीतरी बरळणं हाच उद्योग, चंद्रशेखर बावनकुळे यांचा या नेत्यावर घणाघात

आता शिंदे आणि फडणवीस हे दोन खंदे कार्यकर्ते महाराष्ट्राला भेटलेत.

मुखपत्रातून काहीतरी बरळणं हाच उद्योग, चंद्रशेखर बावनकुळे यांचा या नेत्यावर घणाघात
चंद्रशेखर बावनकुळे
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 27, 2022 | 11:03 PM
Share

मुंबई – राज्यात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांची सरकार आहे. ते पुढील वीस वर्षे अशाच पद्धतीने काम करतील. दोनशेहून जास्त विधानसभेच्या जागा जिंकतील, असा दावा भाजपचे प्रदेश अध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी आता पुढील वीसही वर्षे घरातच बसवून काढावेत. विरोधातच बोलावं हेच त्यांच्या नशिबी आहे. वारंवार आमदार बोलले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडा. पण त्यांनी कशी काय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. पण आता भाजप आणि उद्धव ठाकरे यांचा विषय संपलेला आहे, असंही त्यांनी स्पष्ट करून सांगितलं.

आता पुढचे सगळे रस्ते आता बंद आहेत. आता शिंदे आणि फडणवीस हे दोन खंदे कार्यकर्ते महाराष्ट्राला भेटलेत. ते 18 – 18 तास काम करतात. महाराष्ट्राला एक नवीन दिशा देतील, असा आशावादही चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

संजय राऊत हे काय बोलतात, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. ज्यांना रेडे म्हणतात ते आधी त्यांच्याच पक्षात होते ना. मग त्यांना सोडून गेले तर रेडे झाले का. त्यांचा मुख्यमंत्री हा कधी महाराष्ट्रात होणार नाही. त्यांनी फक्त स्वप्न पहावी. प्रत्यक्षात मात्र असं काहीही घडणार नाही, असा टोलाही ठाकरे गटाला लगावला.

संजय राऊत यांच्या पेनाची ताकद गेलेली आहे. केवळ शिवराळ भाषेचा वापर करणे, मुखपत्रातून काहीतरी बरळणं राहणं हाच त्यांचा उद्योग आहे. संजय राऊत कधी स्वतःहून निवडणूक लढले का. ते निवडणूक लढली असती, तर त्यांना त्यांची किंमत काय आहे ते कळले असते. त्यामुळे कुणावरही आरोप करताना त्यांनी आधी विचार करावा, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला.

राज्यपाल यांच्या विधानाशी भाजप कधी सहमत नव्हता. शिवरायांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, राज्यपाल जरी शिवरायांबद्दल बोलले असले तरी त्यांनी किती वेळा शिवरायांचं चरित्र हे आत्मसात केलेला आहे. ते स्वतः शिवनेरीवर चालत गेलेले आहेत, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

Follow Us
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....