AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जो पक्ष सत्तेत असतो तो दावा करतोच, आम्ही जिंकलो”; ग्रामपंचायत निवडणुकीचं संजय राऊत यांनी विश्लेषणच केलं…

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणतेही पक्षीय लेबल लावलं जात नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आमची सत्ता ग्रामपंचायतीवर आली आहे. हा दावा करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

जो पक्ष सत्तेत असतो तो दावा करतोच, आम्ही जिंकलो; ग्रामपंचायत निवडणुकीचं संजय राऊत यांनी विश्लेषणच केलं...
| Updated on: Dec 20, 2022 | 8:43 PM
Share

मुंबईः राज्यातील जवळ जवळ 7 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा आज निकाल लागला. हा निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही या निवडणुकीत आम्हीच बाजी मारली असल्याचा दावा केला. त्याविषयी बोलताना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले की, ग्रामपंचायतींची ही निवडणूक काटे की टक्कर होतीच. मात्र राज्यात जो सत्ताधारी असतो. तो पक्ष नेहमीच ग्रामपंचायतींवर आमचीच सत्ता आल्याचा दावा करत असतो. त्यांनी हा दावा केला असला तरी आमच्या पक्षानेही ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळवले असल्याचेही त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकीविषयी बोलताना खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकाल हा पक्षीय लेबलवर अवलंबून नसतो. त्यामुळे विधानसभा, लोकसभा या निवडणुकांवर या निकालाचा काही एक परिणाम होणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणतेही पक्षीय लेबल लावलं जात नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आमची सत्ता ग्रामपंचायतीवर आली आहे. हा दावा करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील अनेक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला असला तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीनेही अनेक ग्रामपंचायतींवर यश मिळवले आहे. त्यामुळे एकाच पक्षाची सत्ता ग्रामपंचायतीवर आली आहे असं म्हणणं चुकीचे आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

खासदार संजय राऊत यांनी ग्रामपंचायत निकालाचे विश्लेषण करताना म्हणाले की, ग्रामपंचायतीवर ज्या प्रमाणे भाजप आणि शिंदे गटाची जशी सत्ता आली आहे. तशीच काही ग्रामपंचायतींवर आमच्या पक्षाचीही सत्ता आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत आमचीच सत्ता आली असल्याचा दावा करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....