AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जो पक्ष सत्तेत असतो तो दावा करतोच, आम्ही जिंकलो”; ग्रामपंचायत निवडणुकीचं संजय राऊत यांनी विश्लेषणच केलं…

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणतेही पक्षीय लेबल लावलं जात नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आमची सत्ता ग्रामपंचायतीवर आली आहे. हा दावा करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

जो पक्ष सत्तेत असतो तो दावा करतोच, आम्ही जिंकलो; ग्रामपंचायत निवडणुकीचं संजय राऊत यांनी विश्लेषणच केलं...
| Updated on: Dec 20, 2022 | 8:43 PM
Share

मुंबईः राज्यातील जवळ जवळ 7 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा आज निकाल लागला. हा निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही या निवडणुकीत आम्हीच बाजी मारली असल्याचा दावा केला. त्याविषयी बोलताना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले की, ग्रामपंचायतींची ही निवडणूक काटे की टक्कर होतीच. मात्र राज्यात जो सत्ताधारी असतो. तो पक्ष नेहमीच ग्रामपंचायतींवर आमचीच सत्ता आल्याचा दावा करत असतो. त्यांनी हा दावा केला असला तरी आमच्या पक्षानेही ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळवले असल्याचेही त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकीविषयी बोलताना खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकाल हा पक्षीय लेबलवर अवलंबून नसतो. त्यामुळे विधानसभा, लोकसभा या निवडणुकांवर या निकालाचा काही एक परिणाम होणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणतेही पक्षीय लेबल लावलं जात नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आमची सत्ता ग्रामपंचायतीवर आली आहे. हा दावा करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील अनेक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला असला तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीनेही अनेक ग्रामपंचायतींवर यश मिळवले आहे. त्यामुळे एकाच पक्षाची सत्ता ग्रामपंचायतीवर आली आहे असं म्हणणं चुकीचे आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

खासदार संजय राऊत यांनी ग्रामपंचायत निकालाचे विश्लेषण करताना म्हणाले की, ग्रामपंचायतीवर ज्या प्रमाणे भाजप आणि शिंदे गटाची जशी सत्ता आली आहे. तशीच काही ग्रामपंचायतींवर आमच्या पक्षाचीही सत्ता आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत आमचीच सत्ता आली असल्याचा दावा करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.