AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जो पक्ष सत्तेत असतो तो दावा करतोच, आम्ही जिंकलो”; ग्रामपंचायत निवडणुकीचं संजय राऊत यांनी विश्लेषणच केलं…

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणतेही पक्षीय लेबल लावलं जात नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आमची सत्ता ग्रामपंचायतीवर आली आहे. हा दावा करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

जो पक्ष सत्तेत असतो तो दावा करतोच, आम्ही जिंकलो; ग्रामपंचायत निवडणुकीचं संजय राऊत यांनी विश्लेषणच केलं...
| Updated on: Dec 20, 2022 | 8:43 PM
Share

मुंबईः राज्यातील जवळ जवळ 7 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा आज निकाल लागला. हा निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही या निवडणुकीत आम्हीच बाजी मारली असल्याचा दावा केला. त्याविषयी बोलताना खासदार संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले की, ग्रामपंचायतींची ही निवडणूक काटे की टक्कर होतीच. मात्र राज्यात जो सत्ताधारी असतो. तो पक्ष नेहमीच ग्रामपंचायतींवर आमचीच सत्ता आल्याचा दावा करत असतो. त्यांनी हा दावा केला असला तरी आमच्या पक्षानेही ग्रामपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळवले असल्याचेही त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकीविषयी बोलताना खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकाल हा पक्षीय लेबलवर अवलंबून नसतो. त्यामुळे विधानसभा, लोकसभा या निवडणुकांवर या निकालाचा काही एक परिणाम होणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणतेही पक्षीय लेबल लावलं जात नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आमची सत्ता ग्रामपंचायतीवर आली आहे. हा दावा करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील अनेक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला असला तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीनेही अनेक ग्रामपंचायतींवर यश मिळवले आहे. त्यामुळे एकाच पक्षाची सत्ता ग्रामपंचायतीवर आली आहे असं म्हणणं चुकीचे आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

खासदार संजय राऊत यांनी ग्रामपंचायत निकालाचे विश्लेषण करताना म्हणाले की, ग्रामपंचायतीवर ज्या प्रमाणे भाजप आणि शिंदे गटाची जशी सत्ता आली आहे. तशीच काही ग्रामपंचायतींवर आमच्या पक्षाचीही सत्ता आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत आमचीच सत्ता आली असल्याचा दावा करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.