AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात खरंच राष्ट्रपती राजवट लागू होणार? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

सत्तासंघर्षाचा निकाल नेमका काय लागेल? याकडे अख्या महाराष्ट्राच्या नजरा आहेत. पण निकालाआधीच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी मोठं भाकित केलंय. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागेल, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात खरंच राष्ट्रपती राजवट लागू होणार? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
| Updated on: Mar 29, 2023 | 10:32 PM
Share

मुंबई : सुप्रीम कोर्टात (Supreme Court), आमदारांच्या अपात्रेसंदर्भात निकाल अजून जाहीर झालेला नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 16 आमदार अपात्र झाले तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना अपात्र करण्याची मागणी ठाकरे गटाची आहे. त्यावर सुप्रीम कोर्टातल्या घटनापीठासमोर सुनावणी पूर्ण झालीय. पण थेट अपात्रतेसंदर्भातला निर्णय आला तर 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा समावेश आहे. आणि शिंदे अपात्र झाले तर सरकारच पडणार. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागेल, असं जयंत पाटलांना वाटतंय.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटतंय की, 16 आमदार अपात्र होणार आणि सरकार कोसळणार. जर कोर्टाचा निकाल शिंदेंच्या बाजूनं लागला तर आमदार अपात्र होणार नाही आणि सरकार शाबूत राहील. जर कोर्टाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूनं आला तर शिंदेंचं अपात्र झाल्यास सरकार कोसळेल. पण सरकार कोसळणार नाही आणि राष्ट्रपती राजवटही लागणार नाही असं सत्ताधारी म्हणतायत. आता ज्या राष्ट्रपती राजवटीचा उल्लेख जयंत पाटलांनी केला. त्या राष्ट्रपती राजवटीबद्दलही जाणून घेऊयात.

सरकारनं बहुमत गमावल्यास राष्ट्रपती राजवट लागते. जर राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडली असल्यास सरकार घटनात्मक तरतुदींनुसार चालत नसल्यास आणि राज्यानं केंद्राचे महत्वाचे निर्णय अंमलात आणण्यास नकार दिल्यास राष्ट्रपती राजवट लागू शकते.

विशेष म्हणजे जयंत पाटलांनी राष्ट्रपती राजवटीबद्दलच भाकीत केलेलं नाही तर त्यांनी शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावरुनही निशाणा साधलाय. 6 एप्रिलला आपले मंत्री, आमदार आणि खासदारांसह शिंदे अयोध्येला भगवान रामलल्लांच्या दर्शनाला जात आहेत. पण त्यावर जयंत पाटलांनी एकटं जावून पूजा करा, मंत्रिमंडळ कशाला, असा टोला लगावलाय. सत्तांतरानंतर शिंदे सरकारला 9 महिने झालेत. सत्तासंघर्षावर सुनावणी पूर्ण झालीय. निकाल कधीही येऊ शकतो. त्यामुळं निकाल काय येतो, त्यावर पुढच्या घडामोडी अवलंबून असेल.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.