AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘एससी, एसटी आणि ओबीसींचा निधी थांबवला, अजित पवार सर्वात जातीयवादी’, आव्हाडांचा गंभीर आरोप

"जो नाही झाला काका, बहीणीचा, काकींचा, तो काय होणार महाराष्ट्राचा? अजित पवार उत्तरे आम्हालाही देता येतात. फक्त तुम्ही शरद पवार यांच्यावर बोलणं थांबवा. तुम्ही जेवढे थुंकत आहात तेवढं तुमच्याच तोंडावर पडत आहे", अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

'एससी, एसटी आणि ओबीसींचा निधी थांबवला, अजित पवार सर्वात जातीयवादी', आव्हाडांचा गंभीर आरोप
| Updated on: Feb 16, 2024 | 6:54 PM
Share

मुंबई | 16 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “अजित पवार यांनी एससी, एसटी आणि ओबीसी या सगळ्यांचा निधी थांबवण्याचं काम अजित पवार यांनी केलं”, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. “अजित पवार सर्वात जातीयवादी माणूस आहे”, असा घणाघातही जितेंद्र आव्हाड यांनी केला. “खासदार प्रफुल्ल पटेल यांना का उमेदवारी देण्यात आली ते बघा ना. कारण खासदारकीसाठी बरेच जण शर्यतीत आहेत. नाशिकचा एका आमदाराला खासदार व्हायचं होतं. वंशाला व्हायचं होतं. म्हणून प्रफुल्ल पटेल यांना निवडण्यात आलं. पक्षातील भाई कोण तर प्रफुल्ल पटेल”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

“तुमची सर्व बदनामी पक्षाला हानीकारक होती. पण शरद पवार यांनी चुका पोटात घातल्या आणि तुम्हाला संधी दिली. तुम्ही कुठे कुठे बोलत होता, मुतायला निघाला होतात. पण तरीही सगळं माफ करुन तुम्हाला सर्व महत्त्वाची पदे दिली. ती शरद पवारांची चूक होती. एससी, एसटी आणि ओबीसी या सगळ्यांचा निधी थांबवण्याचं काम अजित पवार यांनी केलं. सर्वात जातीयवादी माणूस अजित पवार”, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला.

‘हे आम्हाला माहिती नाही का?’

“काय सारखं-सारखं वंश करताय. तुमच्यासारख्या चुका जितेंद्र आव्हाड यांनी केल्या असत्या तर त्यांना पक्षातून हाकललं असतं. शरद पवार गट तुमच्या हातात असताना तुम्ही त्या सगळ्याचे तुकडे केले. तुमचे आणि प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचे किती सुमधुर सबंध होते हे आम्हाला माहिती नाही का?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

‘तुमची पातळी दिवसेंदिवस जास्त घसरत चाललीय’

“तुम्ही ते सेल्फी काढतात ते सांगता ना, त्यासाठी हिंमत आणि आपलेपणा लागतो. रस्त्यात उतरावं लागतं, लोकांशी बोलावं लागतं. सामान्य माणसाला है धैर्य तुमच्यासमोर येण्याचं होतंच नाही. तो सामान्य माणूस आपलेपणाने सुप्रिया ताईंच्या बाजूने येतो आणि फोटो काढून घेतो. हा तुमच्यातला तुसडेपणा आणि ताईंमधला आपलेपणा हे महाराष्ट्राला चांगलं माहीत आहे. तुमची पातळी दिवसेंदिवस जास्त घसरत चालली आहे”, अशी टीका आव्हाडांनी केली.

“जो नाही झाला काका, बहीणीचा, काकींचा, तो काय होणार महाराष्ट्राचा? अजित पवार उत्तरे आम्हालाही देता येतात. फक्त तुम्ही शरद पवार यांच्यावर बोलणं थांबवा. तुम्ही जेवढे थुंकत आहात तेवढं तुमच्याच तोंडावर पडत आहे. अध्यक्ष झालात, पक्षाच्या भल्यासाठी काय निर्णय घेतला? जरा, झारखंड किंवा नागालँडमध्ये जाऊन भा,ण करा. शरद पवारांनी यूएनओमध्ये भाषण केलंय. ते सुद्धा इंग्रजीत, तेही दीड तास. ते शरद पवार आहेत. त्यांच्यासोबत तुलना करु नका. तुम्ही त्यांच्यासमोर एक सेंटीमीटर आहात”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.