AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव बुडवलं; साध्वी कांचन गिरी यांची टीका

राज ठाकरे यांच्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते असं सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं नाव बुडवलं अशी टीका साध्वी कांचन गिरी यांनी केली आहे. (Sadhvi Kanchan giri)

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव बुडवलं; साध्वी कांचन गिरी यांची टीका
Sadhvi Kanchan giri
| Edited By: | Updated on: Oct 18, 2021 | 3:20 PM
Share

मुंबई: राज ठाकरे यांच्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते असं सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं नाव बुडवलं अशी टीका साध्वी कांचन गिरी यांनी केली आहे.

साध्वी कांचन गिरी मुंबईत आल्या आहेत. काल त्यांनी मीडियाशी संवाद साधताना राज ठाकरेंची स्तुती करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरेंबाबत मला काही बोलायचं नाही. त्यांनी त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बुडवलं आहे. बाळासाहेब जे बोलायचे ते करत होते. ते प्रखर हिंदुत्ववादी होते. हिंदूंसाठी ते वाघासारखी डरकाळी फोडायचे, असं कांचन गिरी म्हणाल्या.

उद्धव ठाकरेंवर नाराज

उद्धव ठाकरेंवर मी नाराज आहे. त्यांनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला आहे, असं सांगतानाच पालघरमध्ये हत्याकांड झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपले कान आणि डोळे बंद केले होते, असी टीकाही त्यांनी केली.

राज ठाकरेच बाळासाहेबांचा संकल्प पूर्ण करणार

यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर स्तुती सुमने उधळली. राज ठाकरे आक्रमक नेते आहेत. त्यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसते. तेच बाळासाहेबांचा संकल्प पूर्ण करतील असं सांगतानाच उत्तर भारतीयांबाबत राज यांच्या मनात पूर्वग्रह निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठीच मी मुंबईत आले आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, साध्वी कांचन गिरी यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तब्बल तासभर त्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली. हिंदुराष्ट्र उभारणीच्या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. तसेच राज ठाकरे यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रणही दिलं आहे.

गुरु माँ कांचनगिरी कोण?

गुरु माँ कांचन गिरी या जुना आखाड्याशी संबंधित आहेत. त्या महिला संत म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या दिल्लीच्या सेक्टर-5 मधील वैशाली येथे राहतात. त्यांनी मधल्या काळात देश बचाओ आंदोलन सुरू केलं होतं. हिंदू राष्ट्र व्हावं म्हणून त्यांनी देशभर दौरे सुरू केले आहेत. महाकाल मानव सेवा समितीच्या बॅनरखाली त्यांनी हे अभियान सुरू केलं आहे. त्यांनी देशातील अनेक भागात हिंदूराष्ट्र स्थापन्याचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले आहेत. हिंदुराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी म्हणून त्यांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेशासह विविध राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

धर्म प्रसार कार्य

1991 पासून त्यांनी युरोपीय देशात भारतीय सनातन हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत. त्या गेल्या 20 वर्षांपासून त्या इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या देशातही हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत.

महाकाल मानव सेवान समितीच्या माध्यमातून त्या पर्यावरणाची जागृती करतात

महिलांच्या प्रश्नांवरही त्या काम करत आहेत

महिलांच्या चुकीच्या साक्षीमुळे ज्या पुरुषांना फसवले गेले आहेत. त्या पुरुषांना न्याय देण्याचं कामही त्या करतात

त्या आगामी काळात धर्म ध्वज यात्रा सुरू करणार आहेत.

आत्महत्या करणाऱ्यांना या मार्गावरून न जाण्यासाठीही त्या प्रयत्न करत असतात.

संबंधित बातम्या:

Chhagan Bhujbal | …म्हणून अजिबात भीती बाळगण्याचं कारण नाही, हे सरकार मजबूत राहणार : छगन भुजबळ

Kirit Somaiya | अजित पवारांनी स्वत:चा कारखाना विकत घेतला, माझ्याकडे घोटाळ्याचे सगळे पुरावे

Nitesh Rane | गांज्यावर इतकं प्रेम बरं नाही, सामनावरून नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका

(Kanchan Giri criticize Uddhav Thackeray over Hindutva)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.