AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमृता फडणवीसांवर मलिकांचे आरोप, सोमय्या म्हणतात, एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण फक्त ठाकरे-पवारच करू शकतात

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे-पवारांवर टीका केली आहे. अमृता फडणवीसांवर नवाब मलिक यांनी आरोप केले आहेत. (kirit somaiya slams sharad pawar and cm uddhav thackeray)

अमृता फडणवीसांवर मलिकांचे आरोप, सोमय्या म्हणतात, एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण फक्त ठाकरे-पवारच करू  शकतात
kirit somaiya
| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 11:48 AM
Share

मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे-पवारांवर टीका केली आहे. अमृता फडणवीसांवर नवाब मलिक यांनी आरोप केले आहेत. एवढ्या खालच्या पातळीवरचे आरोप केवळ ठाकरे-पवारच करू शकतात. ती नवाब मलिकांची कॅपेसिटी नाही, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.

किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम नातेवाईकांच्या खात्यात वर्ग केली आहे. आम्ही तसा आरोप केला होता. मात्र, ईडी आणि आयकर विभागाच्या धाडीतून हे सिद्ध झालं आहे. त्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठीच समीर वानखेडे आणि अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. समीर वानखेडे आणि अमृता फडणवीस इतकं गलिच्छ राजकारण केवळ शरद पवार आणि उद्धव ठाकरेच करू शकतात. नवाब मलिकची एवढी कॅपेसिटी नाही, असं सांगतानाच केवळ लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हे नाटक सुरू आहे. 19 दिवस ईडीची धाड सुरू आहे हे अजित पवारांनी सांगांवं, असं सोमय्या म्हणाले.

तेव्हा गप्प का बसला होता?

नवाब मलिक गेल्या 12 दिवसांपासून वानखेडेंवर आरोप करत आहेत. वानखेडे यांनी 2006मध्ये लग्न केलं. त्या आधी शेड्यूल कास्ट म्हणून ते नोकरीला लागले. तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? 2007मध्ये आयएएस, आयआरएस म्हणून ते सिलेक्ट झाले. तेव्हा का गप्प बसला? 2015-16मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तुम्ही का गप्प बसला होता? कधी वानखेडेचं नाव काढायचं… कधी अमृता फडणवीसांवर टीका करायची… ही काय नौटंकी आहे? का ही पेड पब्लिसीटी? असा हल्ला त्यांनी चढवला.

हिंमत असेल तर उत्तर द्या

अजित पवारांनी एक हजार 50 कोटीची बेनामी संपत्ती कशी जमवली? पवार कुटुंबांच्या जावयाच्या खात्यात पैसे कुठून आले आणि कसे गेले? याचं उत्तर ठाकरे पवारांना द्यावे लागेल. या सहा फटक्यांपैकी पहिला फटका मी फोडला आहे. हिंमत असेल तर ठाकरे पवारांनी यावर उत्तर द्यावं, असंही ते म्हणाले.

तर दाऊद-पवारांचे संबंध कळले असते

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1992-93मध्ये दंगलीच्या काळात भाषणं केली होती. त्यांची भाषणं ऐकली असती तर त्यांना कळलं असतं दाऊद आणि पवारांचे संबंध काय आहेत? असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध, शरद पवारांनाच पुरावे देणार, दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा

Nawab Malik | ड्रग पेडलर जयदीप राणाशी फडणवीसांचे घनिष्ठ संबंध, नवाब मलिकांनी बॉम्ब फोडला

नवाब मलिकांच्या सनसनाटी आरोपांनंतर अमृता फडणवीसांचं ट्विट, म्हणाल्या…

(kirit somaiya slams sharad pawar and cm uddhav thackeray)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.