AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आम्ही दिल्लीतल्या दोन खेचरांना कायमचे पाणी पाजू’; उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray Attack on Modi-Shah : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह यांच्यावर तुफान हल्ला चढवला. त्यांना महाराष्ट्रात ठाकरे-पवार हेच दिसत आहेत. त्यांना यंदा महाराष्ट्राचा शाप काय असतो ते लक्षात येईल, असा घणाघात त्यांनी केला.

'आम्ही दिल्लीतल्या दोन खेचरांना कायमचे पाणी पाजू'; उद्धव ठाकरे कडाडले
उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
| Updated on: May 12, 2024 | 9:33 AM
Share

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. तीन टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्रात तळ ठोकला. मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. त्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता सडेतोड उत्तर दिले आहे. खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी त्यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी मोदी-शाह जोडीवर घणाघात केला.

लोकशाही टिकविण्यासाठी लढा

सध्या लोकशाही टिकविण्यासाठी निकराचा लढा सुरु आहे. हे महाभारत त्यासाठीच सुरु आहे. स्वातंत्र्य टिकविण्यासाठी हा लढा सुरु आहे, असे परखड मत उद्धव ठाकरे यांनी मांडले. महाराष्ट्रात भगवी लहर आहे. राज्यासह देशात बदल नक्की होत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

त्यांना कायमचे पाणी पाजू

मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रेम मिळाले. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो ते अनुभवा, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाह यांच्यावर मोठी टीका केली. ”दिल्लीतल्या दोन खेचरांना महाराष्ट्रातील पाण्यात फक्त पवार-ठाकरेच दिसत आहेत. आम्ही त्या खेचरांना कायमचे पाणी पाजू.” अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला.

देशाला आता जाग आली

‘आम्ही प्रयत्न करतोय पूर्णपणाने आणि मला बहुतेक सभांतूनही असं जाणवतंय की, आम्ही तर बोलत असतोच, पण लोकांनाही आता सगळं कळलेलं आहे. एखाद्या मुद्याला सुरुवात केली की, लोकच समोरून एकेक विषय बोलत असतात. म्हणजे जागृती हा विषय झालेला आहे’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काल माझी रायगडला सभा होती. पूर्वी ते एक नाटक होतं ‘रायगडाला जेव्हा जाग येते.’ आता संपूर्ण देशाला जाग आलेली आहे, असा दावा ठाकरे यांनी केला.

ते गल्ली-बोळात प्रचार करतील

मी मुद्दामहून आता मोदी सरकार असा उल्लेख करतोय. कारण मला मोदी सरकार नकोय. मला भारत सरकार पाहिजे; पण मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत. आता मला वाटतं, एखाद्या गल्लीबोळातही रोड-शोसुद्धा करतील. असा टोला उद्धव टाकरे यांनी लगावला. त्या दोघांनी असा दौरा करावा. महाराष्ट्र कसा आहे? महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे, असे ते म्हणाले.

Follow Us
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.