AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात भाजपच्या परभावाला हा फॅक्टर ठरला कारणीभूत, फडणवीसांनी इंडिया आघाडीला लगावला असा टोला

Devendra Fadnavis On Result : लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला विशेष कामगिरी दाखविता आली नाही. राज्यात मोठा फटका बसल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत यासंबंधीचे मत व्यक्त केले.

राज्यात भाजपच्या परभावाला हा फॅक्टर ठरला कारणीभूत, फडणवीसांनी इंडिया आघाडीला लगावला असा टोला
देवेंद्र फडणवीस
| Updated on: Jun 05, 2024 | 2:59 PM
Share

राज्यात महाविकास आघाडीने लोकसभेत मोठी मुसंडी मारली. त्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जोरदार प्रदर्शन केले. तर भाजपला राज्यात मोठा फटका बसला. भाजपने लोकसभेसाठी मोठी कंबर कसली होती. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात तळ ठोकून होते. अनेक प्रचार सभा, रॅली आणि तळागळापर्यंत मजबुत संघटन असताना विशेष कामगिरी बजावता न आल्याने त्याचे भाजपने विश्लेषण सुरु केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्दांवर मत मांडले.

देशात एनडीचे सरकार

पंडित नेहरूनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा आशीर्वाद मोदींना मिळाला आहे. भारतामध्ये एनडीएचं सरकार येतंय. हा ऐतिहासिक क्षण आहे. ६२ नंतर पहिल्यांदाच असं घडत आहे. ओडिसात पहिल्यांदा भाजपचं सरकार येत आहे. आंध्रप्रदेशातही चंद्रबाबूंच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार येत आहे. अरुणाचलमध्ये भाजपचं सरकार आलं आहे. विधानसभा निवडणुकीतही जनतेने भाजप आणि एनडीएला कौल दिला आहे, असे फडणवीस म्हणाले.

इंडिया आघाडीपेक्षा तर भाजपला जास्त जागा

इंडिया आघाडी तयार झाली. त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या जागा एकट्या भाजपला मिळाल्या आहेत. सर्व लोकांनी एकत्र येऊन मोठी रणनीती केली. पण तरीही भाजप त्यांच्या पेक्षा मोठी राहिली आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. भाजप आणि एनडीएचे घटक पक्ष मिळून सरकार तयार होत आहे.

या फॅक्टरने बिघडवला ‘खेळ’

महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश आलं नाही. किंबहुना अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा महाराष्ट्रात मिळाल्या. राज्यात आमची लढाई जशी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांशी होती. काही प्रमाणात नरेटिव्हच्या विरोधात लढावं लागेल. संविधान बदलणार असा नरेटिव्ह तयार करण्यात आला होता. तो नरेटिव्ह ज्या प्रमाणात थांबवायला हवा होता त्या प्रमाणात आम्ही थांबवू शकलो नाही. हे खरं आहे, असे सांगत फडणवीसांनी या संविधान, घटना बदलण्याचे जे नरेटिव्ह तयार करण्यात आलं. त्यामुळे मोठा फटका बसल्याचे मत मांडले. जनादेश शिरसांवद्य मानून पुढची तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे. जास्त जागा मिळालेल्या महाविकास आघाडीचं त्यांनी अभिनंदन केले.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.