AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पॅनिक होऊ नका, सुरक्षेसाठी विधीमंडळाचं कामकाज आटोपलं: मुख्यमंत्री

मुंबई: “अधिवेशनपेक्षा राज्याची सुरक्षा महत्वाची आहे. मात्र पॅनिक होण्याची अर्थात घाबरण्याची गरज नाही. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, इंटेलिजन्स आणि कायदा सुरक्षेची माहिती घेतली आहे. सर्वपक्षीय बैठकीत याबाबतची माहिती दिली. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आटोपतं घेत आहोत”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. अधिवेशनाचं कामकाज आटोपतं घेत असलो तरी महत्त्वाचं कामकाज झालं आहे, असं मुख्यमंत्री […]

पॅनिक होऊ नका, सुरक्षेसाठी विधीमंडळाचं कामकाज आटोपलं: मुख्यमंत्री
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

मुंबई: “अधिवेशनपेक्षा राज्याची सुरक्षा महत्वाची आहे. मात्र पॅनिक होण्याची अर्थात घाबरण्याची गरज नाही. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, इंटेलिजन्स आणि कायदा सुरक्षेची माहिती घेतली आहे. सर्वपक्षीय बैठकीत याबाबतची माहिती दिली. त्यामुळे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज आटोपतं घेत आहोत”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

अधिवेशनाचं कामकाज आटोपतं घेत असलो तरी महत्त्वाचं कामकाज झालं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करुन शेकडो दहशतवादी ठार केले. त्यानंतर पाकिस्तानकडूनही एअर स्ट्राईकचा प्रयत्न होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाच्या विविध राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतही हा अलर्ट देण्यात आला आहे.

असा अलर्ट असताना राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात पोलीस सुरक्षेच्या कामकाजात अडकून आहेत. त्यामुळे राज्य सरकारने अधिवेशन मुदतीपूर्वीच संपवण्याचा निर्णय घेतला.  राज्य सरकारच्या या ठरावाला सर्वपक्षीयांनी एकमताने पाठिंबा दिला. पुढील अधिवेशन 17 जूनला सुरु होईल. हे विधानसभेचं पावसाळी अधिवेशन असेल.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, इंटेलिजन्स आणि कायदा सुरक्षेची माहिती सर्वपक्षीय बैठकीत दिली. सर्वपक्षीय बैठकीत अधिवेशन आटोपतं घेण्याचा निर्णय घेतला. कामकाज पूर्ण झाले आहे. अधिवेशनापेक्षा राज्याची सुरक्षा महत्वाची आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितलं.

अंतर्गत सुरक्षा अबाधित  राखणे गरजेचं आहे. पॅनिक होण्याची स्थिती नाही, मात्र काळजी घेणे गरजेचेच आहे. 6 हजार पोलीस अधिवेशनाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यामुळे राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांवरील भार कमी व्हावा आणि अन्य ठिकाणी सुरक्षा सज्ज व्हावी यादृष्टीने अधिवेशन आटोपतं घेत आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

Follow Us
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!
INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? राऊतांनी दिले मोठे संकेत
Sanjay Raut UNCUT | INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत
मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
Kolhapur | चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?