AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्नाटक सरकारचा मराठी माणसांवर ‘वरंवटा’, घटनात्मक अधिकारांवरच घाला, या मंत्र्यांने दंडेलशाहीचा इतिहासच मांडला

दिल्लीत ज्या प्रमाणे पंजाबी लोक जास्त आहेत, म्हणून दिल्लीत अनेक परिसरात पंजाबी भाषेतील फलक दिसून येतात. त्याप्रमाणे कर्नाटकात का केले जात नाही असा सवालही दीपक केसरकर यांनी उपस्थितकेला आहे.

कर्नाटक सरकारचा मराठी माणसांवर 'वरंवटा', घटनात्मक अधिकारांवरच घाला, या मंत्र्यांने दंडेलशाहीचा इतिहासच मांडला
| Updated on: Dec 01, 2022 | 4:02 PM
Share

मुंबईः कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांसह अक्कलकोट आणि पंढरपूर या गावांवर दावा केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारसह विरोधकांनी कर्नाटच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करण्यात आली आहे. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी कर्नाटक सरकारवर टीका करताना त्यांनी, बेळगावसह परिसरातील मराठी माणसांचा घटनात्मक अधिकारच कर्नाटक सरकार हिरावून घेत असल्याचा गंभीर आरोप दीपक केसरकर यांनी कर्नाटक सरकारवर केला आहे.

कर्नाटकातील मराठी भाषीक असलेल्या गावांवर नेहमीच कर्नाटक सरकारकडून वरंवटा फिरवला जातो. तेथील मराठी माणसांचे स्थलांतर असो किंवा बेळगावमध्ये विधानसौध इमारतीची उभारणी असो.

या सगळ्या पद्धतीने मराठी माणसांवर कर्नाटक सरकारकडून विविध अंगाने अन्याय केला जात असून अन्याय करणे एवढीच नीती कर्नाटकातील सरकारने अवलंबविली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

कर्नाटक राज्यात ज्या ठिकाणी मराठी भाषिक आहेत, त्या ठिकाणीही सक्तीने तेथीन अन्यायकारक सरकरकडून कानडी भाषेतच फलक लावले जात आहेत.

द्विभाषिक नागरिक तेथे राहत असूनही गावांची नावं अथवा रस्त्यावर असलेली फलकही सक्तीने कन्नड भाषेतच लावले जात आहेत.

दिल्लीत ज्या प्रमाणे पंजाबी लोक जास्त आहेत, म्हणून दिल्लीत अनेक परिसरात पंजाबी भाषेतील फलक दिसून येतात. त्याप्रमाणे कर्नाटकात का केले जात नाही असा सवालही दीपक केसरकर यांनी उपस्थितकेला आहे.

आपल्या भाषेत शिक्षण घेण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला आहे मात्र कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी फक्त कन्नड भाषेची सक्ती त्या राज्याकडून केली जात आहे.

जी लोकशाहीच्या विरोधात असल्याचा घणाघात दीपक केसरकर यांनी कर्नाटक सरकारवर केला आहे. तेथील लोकांना शासकीय कागदपत्रंही मराठी भाषिक मराठीत न मिळता ती कन्नडमध्येच दिली जात आहेत.

त्यामुळे कर्नाटकातील मराठी भाषिकांचा घटनात्मक अधिकारही तेथील सरकारने नाकारला असल्याचा गंभीर आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.