VIDEO: रियाज भाटी पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला?, त्याच्याशी तुमचा संबंध काय?; नवाब मलिकांचा सवाल

अंडरवर्ल्डशी संबंधित रियाज भाटी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत कसा पोहोचला? सहार विमानतळावर रियाज भाटीला दोन बनावट पासपोर्टनिशी पकडण्यात आलं होतं. (Maharashtra minister nawab malik reply to devendra fadnavis)

VIDEO: रियाज भाटी पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला?, त्याच्याशी तुमचा संबंध काय?; नवाब मलिकांचा सवाल
nawab malik
Follow us
| Updated on: Nov 10, 2021 | 11:05 AM

मुंबई: अंडरवर्ल्डशी संबंधित रियाज भाटी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत कसा पोहोचला? सहार विमानतळावर रियाज भाटीला दोन बनावट पासपोर्टनिशी पकडण्यात आलं होतं. त्याला जामीन कसा मिळाला? देवेंद्र फडणवीसांचे रियाज भाटीशी संबंध काय? असा सवाल नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी गुन्हेगारी जगताशी फडणवीसांचे कसे संबंध आहेत याची पोलखोल केली.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी गुन्हेगारी जगताशी फडणवीसांचे कसे संबंध आहेत याची पोलखोल केली. रिजाय भाटी कोण आहे? हा सवाल तुम्हाला आहे. 29 ऑक्टोबर रोजी सहार विमानतळावर बनावट पासपोर्टसह पकडला गेला. त्याच्यावर दाऊद इब्राहिमशी त्याचे संबंध असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. रियाज भाटी कोण आहे हे सर्वांना माहीत होतं. डबल पासपोर्टसह एखादा व्यक्ती पकडला जातो आणि दोन दिवसात तो सुटतो त्यामागे काय खेळ होता? रियाज भाटी तुमच्या सोबत अनेक कार्यक्रमात कसा दिसला? रियाज भाटी भाजपच्या कार्यक्रमात का दिसत होता? तुमच्या डिनर टेबलपर्यंत रियाज भाटी कसा जात होता? देशाच्या पंतप्रधानांवर आरोप करत नाही. पण त्यांच्या कार्यक्रमात कोणी जात असेल तर स्कॅनिंग केल्याशिवाय कुणाला पास दिला जात नाही. पंतप्रधान मुंबईत आले. तेव्हा त्यांच्यासोबत रियाज भाटीने फोटो काढले. कोणत्याही स्क्रुनिटीशिवाय रियाज भाटी पंतप्रधानांपर्यंत कसा पोहोचला? त्याचे कारण काय? अशी प्रश्नांची सरबत्तीच मलिक यांनी केली. रियाज भाटीला आशीर्वाद असल्याशिवाय तो पंतप्रधानांच्या कार्यक्रमात जाऊच शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

फडणवीसांच्या आशीर्वादाने खंडणी वसुली

तुम्ही मुख्यमंत्री असताना गुन्हेगारांना सरकारी पदांवर बसवले. बनावट नोटांचं नेक्सस चालवलं. तुम्ही रियाज भाटीच्या माध्यमातून वसुलीचं काम केलं. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून वसुली केली. विदेशातून गुंड फोन करायचे आणि पोलीस सेटलमेंट करायचे. हा सर्व खेळ तुमच्या आशीर्वादाने सुरू होता. आज एवढंच सांगतो. यापुढे फडणवीसांचे आणखी काळेधंदे उघड करणार, असा इशाराही त्यांनी दिला.

त्या प्रकरणाची चौकशी करा

रियाज भाटी फरार आहे. मुन्ना यादववर गुन्हे आहेत. या प्रकरणाचा पुन्हा तपास करावा असं आवाहन आम्ही एजन्सीला करत आहोत. बनावट नोटांचं कनेक्शन पाकिस्तानशी आहे. त्यामुळे त्याची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

सिंधुदुर्ग ते मुंबई हवाई प्रवास महागला, तिकीट दराची ‘उड्डाणं’, महिन्याभरात दर चारपट वाढले!

Nawab Malik PC Live : बनावट नोटांच्या रॅकेटला फडणवीस सरकारची सुरक्षा, नवाब मलिकांचा गंभीर आरोप

मोदींनी नोटाबंदी केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट चालवले जायचे: नवाब मलिक

(Maharashtra minister nawab malik reply to devendra fadnavis)

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.