AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभेपेक्षा विधानसभेची निवडणूक अधिक ताकदीने लढणार… महाविकास आघाडीने विधानसभेचे रणशिंग फुंकले

mahavikas aghadi: महाविकास आघाडीच्या या विजयात जनतेचा सिंहाचा वाटा आहे. जनतेने आघाडीला निर्णायक बहुमत दिले आहे. सर्व घटकातून पाठिंबा दिला गेला आहे. या निवडणुकीत आम्ही तीन पक्ष आहोत. तसेच यामध्ये ३० ते ४०च्यावर जनसंघटना होत्या. छोटे पक्षही होते.

लोकसभेपेक्षा विधानसभेची निवडणूक अधिक ताकदीने लढणार... महाविकास आघाडीने विधानसभेचे रणशिंग फुंकले
महाविकास आघाडीतील नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 15, 2024 | 3:04 PM
Share

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने मोठे यश महाविकास आघाडीला दिले आहे. प्रचंड दबाब असताना जनता महाविकास आघाडीच्या बाजुला उभी राहिली. आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी शनिवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उबाठा) या तिन्ही पक्षांची प्राथमिक बैठक झाली. या बैठकीत लोकसभेपेक्षा अधिक ताकदीने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची माहिती महविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतून दिली. पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.

राज्यातील जनतेचे आभार

महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. लोकशाही वाचवण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले आहे. कारण महाविकास आघाडीच्या या विजयात जनतेचा सिंहाचा वाटा आहे. जनतेने आघाडीला निर्णायक बहुमत दिले आहे. सर्व घटकातून पाठिंबा दिला गेला आहे. या निवडणुकीत आम्ही तीन पक्ष आहोत. तसेच यामध्ये ३० ते ४०च्यावर जनसंघटना होत्या. छोटे पक्षही होते. या सर्वांनी मेहनत घेतली. जनजागरण केले. पक्ष आणि संघटनांची यादी आहे. काही सामाजिक कार्यकर्तेही होते. त्यांनीही महाराष्ट्रातील वातावरण निर्माण केलं. राज्यातील जनतेने देशातील लोकशाही वाचवण्यात मोठी भूमिका निभावली. सिंहाचा वाटा आहे, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

महाराष्ट्राने सर्वाधिक बळ दिले

जयंत पाटील यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर पहिल्यांदाच तीन पक्ष सार्वजनीकरित्या एकत्र येत आहे. या विजयासाठी सर्वच मित्र पक्षांनी मेहनत घेतली. विविध संघटनांनीही मोठी कामगिरी बजावली. जनजागरण केले. निर्भय बनो ही संघटना आहे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे आणि निखिल वागळे यांनी चांगले काम केले. त्यामुळे हा विजय प्राप्त झाला आहे. देशातील राजकारणात महाराष्ट्राने वठवलेली भूमिका महत्त्वाची आहे. इंडिया आघाडीला जे बळ जनतेने दिले, त्यात सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले आहे.

मोदी यांच्या जास्त सभा झाल्याने महाविकास आघाडीला यश

राज्यात वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या सभा झाल्या. देशाच्या पंतप्रधानांनी सभा काही राज्यात घेतल्या. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांच्या जेवढ्या सभा होतील. तेवढं आम्ही बहुमता जवळ जाऊ. त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो, असे शरद पवार यांनी सांगितले.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत