AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हंगामातील पहिल्या हापूसची नवी मुंबईच्या बाजारात धडाकेबाज एन्ट्री, एका पेटीची किंमत किती?; किती पेट्या आल्या?

उन्हाळा सुरु झाला की आपल्याला आंब्यांची आठवण येते. मार्च-एप्रिल महिन्यात आंबे खाण्याची वेगळीच मजा असते. अनेकजण लहानपणी गावी विशेष आंबे खाण्यासाठीच जातात. तर शहरातील नागरीक हे बाजारात आंबा येण्याची वाट पाहत असतात. आंब्यांची अशी वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. फळांचा राजा हापूस आंबा नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाला आहे.

हंगामातील पहिल्या हापूसची नवी मुंबईच्या बाजारात धडाकेबाज एन्ट्री, एका पेटीची किंमत किती?; किती पेट्या आल्या?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 29, 2024 | 7:57 PM
Share

नवी मुंबई | 29 जानेवारी 2024 : नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात फळांचा राजा अर्थात कोकणातील हापूस आंब्याची धडाकेबाज एंट्री झाली आहे. एपीएमसी बाजारात पहिल्या वेळेला तब्बल 365 पेट्या दाखल झाल्या आहेत. हा हापूस भाव खावून जात असल्याचे दिसत आहे. पेटीला 6 हजारापासून तब्बल 11 हजारांच्यावर भाव मिळत आहे. खरंतर ही आवक एप्रिल महिन्यात होते. मात्र कोकणातील आंबा बागायतदार लवकर पीक घेत असल्याने आंब्याची आवकही लवकर होत आहे. आता दाखल झालेला आंब्याची मोहोर मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये घेतल्याने पीक लवकर आलं. त्यामुळे आंबा तयार होऊन तो वेळेआधीच बाजारात दाखल झाला आहे.

मात्र या मोहोराला अवकाळी पाऊस झाल्याने रोगाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता दाखल झालेला आंबा कमी प्रमाणात आहे. एप्रिल – मे मध्ये चांगली आवक एपीएमसी बाजारात होऊ शकते, आणि त्याचा परिणाम दरावरही होईल अशी आशा आंबा विक्रेत्यांनी केली आहे. कोकणातील हापूसला देशा बरोबर परदेशातही मोठी मागणी असते. मोठ्या प्रमाणात कोकणातील हापूस विदेशात मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो. याआधी बाजारात रत्नागिरी, दापोलीमधून आलेला हापूस विकला गेला आहे. मात्र या वर्षीच्या हंगामाला तीन ते चार महिने आधीच सुरुवात झाली आहे.

…तर अजून तीन महिने वाट पाहवी लागेल

एप्रिल-मे मध्ये हीच आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमधून मोठी आवक होणार आहे. याचे दर आंबा बागयतदारांना आणि विक्रेत्यांना सुगीचे दिवस आणणारे आणणारे असतील. तर आंबा खवय्यांनाही परवडणारे असतील, असे आंबा विक्रेत्यांनी सांगितले. मात्र आता आलेला आंबा खरेदीसाठी खवय्यांनी चांगलीच गर्दी केली आहे. या आंब्याला भावही चांगला मिळत आहे. तरीही अजून भरघोस खरेदी आणि कुणाला भेट द्यायची असेल आणि दर ही परवडणारे हवे असतील तर अजून तीन महिने वाट पाहवी लागेल, विक्रेत्यांचं म्हणणं आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला