AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…आम्ही एक इंचही जमीन राज्याबाहेर जाऊ देणार नाही, कर्नाटक-महाराष्ट्र वादावरून उद्धव ठाकरेंवर शिंदे गटाची टीका

ज्या गावांवरून त्यांनी दावा सांगितला आहे, ती गावं तर सोडाच पण आम्ही एक इंचही जमीन इतर ठिकाणी सोडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

...आम्ही एक इंचही जमीन राज्याबाहेर जाऊ देणार नाही, कर्नाटक-महाराष्ट्र वादावरून उद्धव ठाकरेंवर शिंदे गटाची टीका
| Updated on: Nov 28, 2022 | 10:34 PM
Share

मुंबईः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांनी सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील 40 गावांसह अक्कलकोट, पंढरपूर या गावांवर दावा करुन त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून काढले होते. त्यावरून केंद्र सरकारसह राज्य सरकारवरही विरोधकांनी जोरदार टीका केली होती. तर माजाी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा दौऱ्यावर असताना पंढरपूरवर कर्नाटकने दावा सांगितल्यावरून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. त्यावरून आज मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

कोरोना काळानंतर आणि महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर उद्धव ठाकरे आताच बुलढाणा दौऱ्यावर गेले आहेत.

ते दौऱ्यावर असल्यामुळे त्यांना कर्नाटक-महाराष्ट्राविषयीच्या वादाची चुकीची माहिती दिली असल्याचा टोला शंभूराज देसाई यांनी लगावल आहे.

त्यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, सांगली जिल्ह्यातील चाळीस गावं, अक्कलकोट, पंढरपूर ही गावं तर सोडाच आम्ही एक इंचही जमीन राज्याबाहेर जाऊ देणार नाही असा विश्वास आणि ठाकरे गटाला टोला त्यांनी लगावला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा दौरा करताना त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून उठलेल्या वादावरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी राज्यात भाजपबरोबल सत्ता आहे आणि केंद्रातही भाजपची सत्ता आहे.

त्याचबरोबर कर्नाटकचे मुख्यमंत्रीही भाजपचेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील गावांवर दावा करण्याचे धाडस त्यांचे होत असल्याची टीका त्यांनी केली होती. त्या टीकेला उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

शंभूराज देसाई यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडू कोणत्याही प्रकारे अशा गोष्टी होणार नाहीत.

त्यामुळे ज्या गावांवरून त्यांनी दावा सांगितला आहे, ती गावं तर सोडाच पण आम्ही एक इंचही जमीन इतर ठिकाणी सोडणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....