AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : ‘पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार’, राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

"पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे मोदीजी... सन्मानिय व्यासपीठ आणि तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो...", अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

Raj Thackeray : 'पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार', राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
| Updated on: May 17, 2024 | 8:07 PM
Share

महायुतीची आज मुंबईत छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती हे या सभेचं विशेष विशिष्ट्य होतं. या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर भाषण केलं. यावेळी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याबाबत महत्त्वाचा उल्लेख केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार असं राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी राज ठाकरे यांनी मोदी सरकारने केलेल्या कामांचं कौतुक केलं. “पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे मोदीजी… सन्मानिय व्यासपीठ आणि तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो…”, अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

“मोदी तुम्ही अनेकदा मुंबईत आलात. पण २१ वर्षावर आपण शिवतीर्थावर आलात. मला आठवतंय त्यावेळी तुम्ही कमळातून बाहेर आला होता. आणि २०१४ला आपण कमळ बाहेर काढलं. मी फार वेळ बोलणार नाही. मोदींचं भाषण ऐकायचं आहे. तीन टप्प्यात बोलणार आहे. एक टप्पा झाला आहे. पहिला टप्पा होता. मोदींची पाच वर्ष. त्यावर बोलायचं ते २०१९मध्ये बोलून गेलो. आता गेली पाच वर्ष. मला वाटतं देवेंद्र फडणवीस, अजितदादा शिंदे सर्वांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर वेळ घालवला. जे सत्तेत येणार नाही. त्यांच्याबद्दल का बोलत नाही. काही आवश्यकता नाहीये त्यांची. अनेक योजना आहेत. ज्या पाच वर्षात झाल्या नाहीत. मी सभेत म्हटलं टिकेच्यावेळी टीका प्रशंसेच्या वेळी प्रशंसा”, असं राज ठाकरे म्हणाले.

‘मोदींना धन्यवाद देतो’

“९०च्या दशकात आपल्या कारसेवकांना ठार मारलं. मुलायम सरकारने ते केलं. बाबरीचा ढाचा पडला. राम मंदिर कधी होईल असं वाटत होतं. मनात आलं हे मंदिर कधी होणार नाही. मोदींना धन्यवाद देतो. तुम्ही होता म्हणून राम मंदिर होऊ शकलं. नाही तर ते झालंच नसतं. जेव्हापासून मी पूर्वीचा इतिहास स्वातंत्र्यानंतरचा इतिहास बघतो तेव्हा एक गोष्ट कानावर पडायची. ३७० कलम रद्द झालं पाहिजे. इतक्या वर्षात ती गोष्ट झाली नाही. ती मोदींनी केली. काश्मीरमध्ये जाऊन तुम्ही जागा घेऊ शकता. तो भारताचा भाग आहे हे आता सिद्ध झालं”, असं राज ठाकरे म्हणाले.

‘याला धाडसी निर्णय म्हणतात’

“राजीव गांधी पंतप्रधान झाले तेव्हा मोठी केस झाली होती. प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं. शहाबानोच्या बाजूने कोर्टाने निकाल लावला. त्यानंतर राजीव गांधींनी बहुमताच्या आधारे निकाल काढून टाकला. त्या बाईला न्याय मिळाला होता. तो काढून टाकला. एका छोट्या पोटगीसाठी. पण मोदींनी ती गोष्ट करून दाखवली. त्यांनी ट्रिपल तलाक हा कायदा रद्द केला. देशातील सर्व मुस्लिम महिलांमध्ये समाधानाचे वातावरण झालं. रात्री नवरा आला शुद्धीत आला बेशुद्धीत आहे माहीत नाही. तलाक तलाक बोलला तर करायचं काय पुढे., पण मोदींनी कायदाच रद्द केला. याला धाडसी निर्णय म्हणतात. इतकी वर्ष जी गोष्ट झाली नाही. ती केली ही मोठी गोष्ट आहे. मोदीजी पुढच्या पाच वर्षासाठी मी तुमच्यापाठी उभा आहे. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. मला त्या बोलून दाखवायच्या आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले.

विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक
आम्ही चहापाण्याला कशासाठी जायचं? भास्कर जाधव आक्रमक.
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका
लाडकी बहिणीच्या सुरक्षितेकडे सरकारचं दुर्लक्ष; वडेट्टीवारांची टीका.
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत
तपोवन सुंदर आहे...फक्त 'हे' बोलले पाहिजेत.
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल
शेतकऱ्यांना तारीख पे तारीख! विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल.
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.