AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Urfi Javed : महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘उर्फी’करण, सर्वच घसरले, दोष…; संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

उर्फीच्या ढालीमागे अंजलीसारख्या अनेक निर्भयांचा आकांत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचेच उर्फीकरण झाले आहे. सर्वच घसरले आहे, दोष कुणाला द्यावा?

Urfi Javed : महाराष्ट्राच्या राजकारणाचे 'उर्फी'करण, सर्वच घसरले, दोष...; संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
urfi javedImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 15, 2023 | 8:11 AM
Share

मुंबई: उर्फी जावेद हिच्या तोकड्या कपड्यांवरून सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीला घेरल्यानंतर शिवसेनेपासून ते काँग्रेस, राष्ट्रवादीपर्यंतच्या नेत्यांनी या वादात उडी घेऊन चित्रा वाघ यांच्यावरच टीका केली आहे. तर शिंदे गटाने उर्फीला खडेबोल सुनावले आहे. आता या वादात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. दैनिक सामनातील आपल्या रोखठोक सदरातून त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

पूजा चव्हाणला अजून न्याय मिळालेला नाही. पण आता भाजपचे आंदोलन उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यात अडकले आहे. अंजलीचा आक्रोश कंझावालच्या रस्त्यावर घुमतो आहे. पण मुंबईत उर्फीच्या तोकड्या कपड्यांनी गदारोळ केला आहे.

उर्फीच्या ढालीमागे अंजलीसारख्या अनेक निर्भयांचा आकांत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचेच उर्फीकरण झाले आहे. सर्वच घसरले आहे, दोष कुणाला द्यावा? असा सवालच संजय राऊत यांनी रोखठोक या सदरातून केला आहे.

मॉरल पोलिसिंग भाजपवरच उलटले

उर्फी प्रकरणात जे मॉरल पोलिसिंग झाले ते भाजपवरच उलटले आहे. उर्फी कोण? ती काय करते? या भानगडीशी सामान्ज जनतेला काही पडलं नव्हते. उर्फीने तोकडे कपडे घातल्याने बलात्कार वाढतील हा दावा हस्यास्पद आहे. महिलांवरील अत्याचार ही एक विकृती आहे. ही विकृती कायद्यावरही मात करते, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

जगात नाचक्की झाली

इकडे भाजप उर्फी प्रकरणात लढा देत असतानाच तिकडे देशाच्या राजधानीत धक्कादायक घटना घडली. दिल्लीत असभ्यता आणि क्रूरतेचे टोक गाठणारे कृत्य भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने केले. अंजली नावाच्या तरुणीच्या स्कुटीला धडक मारली. त्यानंतर ती खाली कोसळली. तिचा पाय त्या गाडीच्या चाकात अडकला.

भरधाव कारने अंजलीस घासत फरफटत अनेक किलोमीटर नेले. त्या गाडीच्या चाकात अडकून ती तफडत होती. आक्रोश करत होती. तो कारचालक भाजपचा पदाधिकारी होता. दिल्लीतील या घटनेने आपली जगात नाचक्की झाली, अशी टीकाही करण्यात आली आहे.

एका उर्फी जावेदचं काय घेऊन बसलात?

निर्भयाप्रकरणाच्यावेळी भाजप दिल्लीसह देशभरात रस्त्यावर उतरला होता. तोच भाजप आज सत्तेवर असल्याने अंजली प्रकरणात थंड पडला. मुंबईत उर्फीच्या तोकड्या कपड्यांवरून संस्कृती रक्षणाचे धडे देणाऱ्यांनी अंजलीचा आक्रोश जणू ऐकलाच नाही. अशा अनेक अंजलींनी गेल्या सात वर्षात तडफडून प्राण सोडले. एका उर्फी जावेदचे काय घेऊन बसलात?; असंही राऊत यांनी भाजपला सुनावलं आहे.

Follow Us
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.