AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मानसिक संतुलन ढासळलंय, मानसिक वैफल्यातून…; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

BJP Leader Ashish Shelar on Uddhav Thckeray Statement About Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना दिसतात. त्यांच्या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आशिष शेलार नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

मानसिक संतुलन ढासळलंय, मानसिक वैफल्यातून...; भाजप नेत्याचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
| Updated on: May 18, 2024 | 4:02 PM
Share

सध्या देशात लोकसभा निवडणुका होत आहेत. अशात जाहीक सभांचा धडाका सुरु आहे. ठिक-ठिकाणी प्रचार सभा होत आहेत. आरोप- प्रत्यारोपांच्या उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोकदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा फडतूणवीस असा उल्लेख केला. यावरून भाजपने उद्धव ठाकरेंवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन ढासळलं आहे. मानसिक वैफल्यातून केलेलं हे भाष्य आहे. त्यांनी हे विसरू नये, त्यांच्या नावाचाही अपभ्रंश होऊ शकतो. आमच्यावर संस्कार आहेत अन्यथा आम्ही उठाबशा कशा काढायच्या हे सांगू शकतो, असं आशिष शेलार म्हणालेत.

शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

इतका पळपुता माणूस पाहिला नाही. आधी ईव्हीएम मग मतदान टक्केवारी आता बोटाच्या शाईवर बोलतायेत. पराभव दिसू लागलाय म्हणून बेछूट आरोप करत आहेत, असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांची टोपी फिट बसली आहे, ते बोललेत. संघाच्या टोपीवर उद्धव जी तुम्ही टीका केलीय. मत मिळवण्याचा प्रयत्न करत आहात. उद्धव ठाकरे काँग्रेसच्या जाहीरनाम्याला पाठिंबा देत आहेत. म्हणजे त्यांना माओवादी जाहीरनामा मान्य आहे. जनता हे माफ करणार नाही, असं आशिष शेलार म्हणालेत.

विरोधकांवर टीकास्त्र

इंडिया आघाडी पत्रकार परिषदेवर आशिष शेलारांनी टीका केली आहे. भ्रम निर्माण कोण करत आहे? पूर्ण निवडणुकीत भ्रम निर्माण करण्याची फॅक्ट्री महाविकास आघाडीची आहे. आरक्षण बदलणार कोणी म्हटलं कधी मोदींनी म्हटलं का? आमच्या जाहीरनाम्यात नाही. मग हे भ्रम उद्धव ठाकरे की शरद पवारसाहेब पसरवत आहेत?, असा सवाल आशिष शेलारांनी केला आहे.

आशिष शेलार यांनी विरोधकांवर टीका केली आहे. जे. पी. नड्डा म्हणाले की, आम्ही वैचारिक रित्या एकच आहोत. संघ, परिवार, भाजप एकाच मार्गावर चालत आहेत. आमचं रूप मोठं झालंय म्हणून विरोधकांच्या डोक्यावर परिणाम झालाय, असं म्हणत आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.