AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत हवाई रुग्णवाहिकेचे ‘Emergency Landing’, टेक ऑफ दरम्यान चाक निखळले, सर्वजण सुखरुप

वैमानिकाने प्रसंगावधान राखत ‘बेली लँडिंग’ प्रकारे हे विमान मुंबई विमानतळावर सुखरुप उतरवले. (Mumbai Air Ambulance Emergency Landing)

मुंबईत हवाई रुग्णवाहिकेचे ‘Emergency Landing’, टेक ऑफ दरम्यान चाक निखळले, सर्वजण सुखरुप
air-ambulance-
| Updated on: May 07, 2021 | 7:04 AM
Share

मुंबई : नागपूरहून हैदराबादला (Hyderabad) जाणाऱ्या एका हवाई रुग्णवाहिकेचे (Air Ambulance) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले. या विमानात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने त्याची इमर्जन्सी लँडिग करावी लागली. या विमानात 1 रुग्ण, 1 डॉक्टर, 1 नर्स आणि वैमानिकांसह एकूण सात जण  होते. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नाही.  (Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Air Ambulance Emergency Landing)

चाक निखळून पडल्याची माहिती 

मिळालेल्या माहितीनुसार, C-90 VT-JIL हे बीचक्राफ्ट कंपनीचे विमान होते. या विमानाने रात्री 8 च्या सुमारात नागपूरहून हैदराबादला जाण्यासाठी उड्डाण घेतले. त्यावेळी त्यात 1 रुग्ण, 1 डॉक्टर, 1 नर्स आणि वैमानिकांसह एकूण सात जण  होते. नागपूर विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर विमानाचा उजव्या चाकात बिघाड झाला. त्यामुळे ते चाक निखळून पडल्याची माहिती वैमानिकाला मिळाली. त्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान राखत ‘बेली लँडिंग’ प्रकारे हे विमान मुंबई विमानतळावर सुखरुप उतरवले.

प्रवाशी नानावटी रुग्णालयात दाखल

यावेळी त्या हवाई रुग्णवाहिकेत एक रुग्ण होता. यावेळी त्या विमानातील वैमानिकाने त्याचे सर्व कसब पणाला लावून याची लँडिग केली. हवेत जवळपास आठ घिरट्या घेतल्यानंतर विमान सुखरुप खाली उतरवण्यात आले. या दरम्यान विमानाला आग लागण्याची भीती होती. त्यामुळे मुंबई विमानतळ प्रशासनाने अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिकेसह इतर सर्व गोष्टी सज्ज करुन ठेवल्या होत्या.

हे विमान खाली उतरवल्यानंतर त्यातील प्रवाशांना तात्काळ नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच या इमर्जन्सी लँडिंग दरम्यान अग्निशमन दलाने काही तास विमानावर पाण्याचा मारा केला. त्यामुळे त्या विमानाची उष्णता शांत झाली.

बेली लँडिंग म्हणजे काय?

बेली लँडिंग किंवा गिअर-अप लँडिंग म्हणजे जेव्हा एखादे विमान लँडिंग गिअरशिवाय लँड करते. त्यावेळी ते मुख्य लँडिंग डिव्हाईस म्हणून त्याच्या खाली असलेल्या किंवा बेलीचा वापर करते. सामान्यत: गिअर-अप लँडिंग हे पायलट लँडिंग गिअर वाढवण्यास विसरल्यानंतर केली जाते किंवा पायलट तांत्रिक बिघाडामुळे लँडिंग गिअर वाढवण्यास सक्षम नसतो. त्या परिस्थितीदरम्यान बेली लँडिंग केली जाते.  (Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Air Ambulance Emergency Landing)

संबंधित बातम्या :

Corona Vaccine : लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी मोठा निर्णय, आदित्य ठाकरेंची महापालिका आयुक्तांशी चर्चा

मुंबईकरांनो लक्ष द्या, ‘कोविन-ॲप’ नोंदणी आणि प्राप्त ‘अपॉइंटमेंट स्लॉट’नुसारच लसीकरण

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.