AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, दोन दिवस पडलेल्या पावसाने केली मोठी कमाल

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणक्षेत्रात सातत्याने पाऊस सुरु आहे.

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, दोन दिवस पडलेल्या पावसाने केली मोठी कमाल
| Updated on: Jul 09, 2024 | 3:48 PM
Share

Mumbai Dam Water Level : मुंबईसह उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्यासाठ्यात घट झाल्याने संपूर्ण शहरात 10 टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत बहुतांश ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा सुरु आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागत आहे. पण रविवारपासून मुंबईत सुरु असलेल्या पावसाने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.

सप्टेंबरपर्यंतच्या पाण्याची चिंता मिटली

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग यांसह कोकण किनारपट्टीवर रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मुंबईत सोमवारी 71 हजार 147 दशलक्ष लीटर पाणीसाठा नोंदवण्यात आला. मुंबईतील सातही धरणात एकूण 20.48 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सप्टेंबर महिन्यापर्यंतच्या पाणीसाठ्याची चिंता मिटल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

धरणक्षेत्रात दमदार पाऊस

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणक्षेत्रात सातत्याने पाऊस सुरु आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. या सातही धरणांमध्ये 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. यातून रोज 3 हजार दशलक्ष पाणीपुरववठा केला जातो. गेल्या दोन दिवसांपासून या धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

गेल्या 24 तासात विहार धरणक्षेत्रात 364 मिमी आणि तुळशी धरणक्षेत्रात 254 मिमी पाऊस पडला. मुंबईतील पवई तलावही काल ओव्हरफ्लो झाला. पण या धरणातील पाणी औद्योगिक वापरासाठी वापरले जातो. तर मोडक सागर धरणात 35.85 टक्के पाणीसाठा आहे. तानसा धरणात 40.61 टक्के, मध्य वैतरणा धरणात 19.51 टक्के, भातसा धरणात 16.13 टक्के पाणीसाठा, विहार धरणात 31.74 टक्के, तुळशी धरणात 45.51 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांची सप्टेंबरपर्यंतची पाण्याची चिंता मिटल्याचे मुंबई महापालिकेने सांगितले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मागील तीन दिवसात जवळपास १० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठी 20.48 टक्के इतका शिल्लक आहे.

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.