AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो आता ट्राफिक जॅमची समस्या विसरा… लवकरच सुरु होणार ई-वॉटर टॅक्सी सेवा; थेट पाण्यातून करता येणार प्रवास

मुंबईत देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी सेवा लवकरच सुरू होणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी दरम्यान ही सेवा उपलब्ध असेल. एमडीएल आणि जेएनपीटी यांच्यातील करारानंतर ही सेवा सुरू होत आहे.

मुंबईकरांनो आता ट्राफिक जॅमची समस्या विसरा... लवकरच सुरु होणार ई-वॉटर टॅक्सी सेवा; थेट पाण्यातून करता येणार प्रवास
Mumbai e-water taxi
| Updated on: Jan 21, 2025 | 11:07 PM
Share

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून अनेक विकासाचे प्रकल्प राबवले जात आहेत. त्यातच आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील पहिलीवहिली ई-वॉटर टॅक्सी लवकरच मुंबईत सुरु होणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) दरम्यान ही टॅक्सी सेवा चालवण्यात येणार आहे. नुकतंच याबद्दल माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) आणि जेएनपीटी यांच्यात एक करार करण्यात आला. या करारनंतर आता पुढील महिन्यांपासून ई-वॉटर टॅक्सी ही सेवा नियमितपणे सुरू केली जाणार आहे. यामुळे मुंबईकरांना ई-वॉटर टॅक्सीचा अनुभव घेता येणार आहे.

मुंबईत ई-वॉटर टॅक्सी सुरु झाल्यानंतर मुंबईकरांसाठी एक नवीन वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच या नवीन वाहतूक मार्गाच्या पर्यायाने मुंबईत सातत्याने उद्भावणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. मुंबईत ई-वॉटर टॅक्सी सुरु होणार असल्याने मुंबईकरांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे जलमार्गांच्या वापराला प्रोत्साहन दिले जाईल, असेही बोललं जात आहे.

इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीची वैशिष्ट्ये

मुंबईत सुरु होणारी ई-वॉटर टॅक्सी १३.२७ मीटर लांब आणि ३.०५ मीटर रुंद असणार आहे. या इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीमधून 25 प्रवाशी प्रवास करू शकतात. यामध्ये ६४ किलोवॅटची बॅटरी असणार आहे. ही इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी एकदा चार्जिंग केल्यावर ४ तास चालू शकते. या टॅक्सीचा वेग १४ नॉट्सपर्यंत असणार आहे. या ई-वॉटर टॅक्सीत वातानुकूलित सुविधा म्हणजे एसीची सेवा उपलब्ध असणार आहेत. यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल.

मुंबईकरांना जलमार्गाने करता येणार प्रवास 

विशेष म्हणजे मुंबईतील ही ई-वॉटर टॅक्सी पर्यावरणपूरक असणार आहे. तसेच ही ई-वॉटर टॅक्सी प्रदूषण मुक्त असेल. विशेष म्हणजे सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. मात्र ई-वॉटर टॅक्सी ही इलेक्ट्रीकवर असल्याने ती फारच किफायतशीर असेल. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होईल. या ई-वॉटर टॅक्सीमुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत एक नवी क्रांती घडून येईल. या ई-वॉटर टॅक्सीमुळे आता मुंबईकरांना जलमार्गाने प्रवास करता येणार आहे.

विशेष म्हणजे जर ई-वॉटर टॅक्सी ही योजना मुंबईत यशस्वी झाली तर भविष्यात मुंबईतील इतर भागातही ई-वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा विचार आहे. त्यामुळे मुंबईकरांना वाहतुकीचा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.